'रंग माझा वेगळा' लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, असा असणार मालिकेचा शेवट...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 07:00 AM2023-07-30T07:00:00+5:302023-07-30T07:00:00+5:30

Rang Maza Vegla : मागील ३ वर्षांपासून 'रंग माझा वेगळा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

'Rang Maza Vegla' will soon say goodbye to the audience, the end of the series will be like this... | 'रंग माझा वेगळा' लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, असा असणार मालिकेचा शेवट...

'रंग माझा वेगळा' लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, असा असणार मालिकेचा शेवट...

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील कार्तिक आणि दीपा यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली होती. सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. कार्तिक आणि दीपा आयशाकडून गुन्हा कबुल करुन घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते आहे. 

मागील ३ वर्षांपासून रंग माझा वेगळा ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत दीपा आणि कार्तिक या दोघांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. कार्तिक आणि दीपाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण २२ जुलै रोजी पार पडले आहे. आता या मालिकेच्या जागी तेजश्री प्रधानची नवी मालिका 'प्रेमाची गोष्ट' येणार आहे. 

असा असणार मालिकेचा शेवट...
मालिकेत आपण पाहिले की, इतके दिवस कार्तिक कैद आणि त्याच्या डॉक्टरचं लायसन्स रद्द झालं त्यासाठी दीपाला जबाबदार ठरवत असतो. त्यासाठी तो तिच्यावर सूड उगवणार असतो. मात्र त्यांना एक पुरावा सापडतो ज्यात साक्षीला आयशा मारते आणि ते प्लान करतात. ठरवून या खूनासाठी कार्तिकला जबाबदार ठरवतात. हा पुरावा मीडियासमोर सादर करणार असतात. मात्र हा पुरावा कार्तिकी आणि श्वेतामुळे गायब होतो. पण आयशा मुख्य आरोपी असल्याचे ते सिद्ध करु शकले नाही. यानंतर दीपा आणि कार्तिकमध्ये सर्व काही नीट सुरू आहे. मग ते दोघे आयशाकडून हे सत्य काढून घेण्यासाठी योजना आखतात. कार्तिक पुन्हा आयशाकडे जाणार आणि तिच्यावर प्रेम असल्याचे नाटक करणार. तसेच साक्षीच्या खूनाचा सगळा प्रकार पुन्हा घडवून आणतात. जेणेकरुन आयशाला हे सगळं आठवेल. मात्र त्यांचा हा प्रयत्नही फसतो. आयशाची स्मृती परत येण्यासाठी कार्तिक आणि दीपा आणखी काही प्लानिंग करतात. अखेर आयशाला सगळं आठवणार आणि ती तिचा गुन्हा कबूल करेल. त्यानंतर कार्तिकवरील सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध होईल आणि त्याची निर्दोष सुटका होईल. त्यानंतर पुन्हा कार्तिक आणि दीपाचा सुखाचा संसार होईल. 

Web Title: 'Rang Maza Vegla' will soon say goodbye to the audience, the end of the series will be like this...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.