12 मार्चपासून ‘चंद्रशेखर’ मालिका रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 15:22 IST2018-03-09T09:52:08+5:302018-03-09T15:22:08+5:30

निर्भय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनाचा वेध घेणारी ‘चंद्रशेखर’ नावाची मालिका प्रसारित करण्याची घोषणा ‘स्टार भारत’ वाहिनीने केली ...

From March 12 to the 'Chandrasekhar' series receptionist | 12 मार्चपासून ‘चंद्रशेखर’ मालिका रसिकांच्या भेटीला

12 मार्चपासून ‘चंद्रशेखर’ मालिका रसिकांच्या भेटीला

र्भय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनाचा वेध घेणारी ‘चंद्रशेखर’ नावाची मालिका प्रसारित करण्याची घोषणा ‘स्टार भारत’ वाहिनीने केली आहे. ही 110 भागांची एक मर्यादित मालिका असेल. या मालिकेचे प्रसारण 12 मार्चपासून रात्री 10.00 वाजता करण्यात येणार असून त्यात चंद्रशेखर या लहान मुलाचे रुपांतर एका कट्टर स्वातंत्र्यसैनिकात कसे झाले, त्याचा वेध घेणा-या प्रत्येक प्रसंगाचे दर्शन घडेल. ‘स्टार भारत’च्या ‘भुला दे डर, कुछ अलग कर’ या ब्रॅण्ड ध्येयाशी या मालिकेची संकल्पना अचूक जुळते आणि ती प्रेक्षकांनाही आपल्या भीतीवर मात करण्याचा संदेश देते.

'महादेव','सिया के राम' आणि 'महाकुंभ' यासारख्या मालिकांचे निर्माते अनिरुध्द पाठक यांनी या मालिकेची निर्मिती केली असून स्वातंत्र्यपूर्वकाळात घडणा-या या मालिकेत चंद्रशेखर तिवारी या एका आठ वर्षांच्या निर्भय मुलाचे रुपांतर 'चंद्रशेखर आझाद' या कट्टर क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिकात कसे झाले, त्याचा वेध घेण्यात आला आहे.आझाद यांचे केवळ नाव उच्चारल्यावर तत्कालिन ब्रिटिश सरकारला घाम फुटत असे,इतका ब्रिटिशांनी त्यांचा धसका घेतला होता.या मालिकेतून चंद्रशेखर यांच्या बहुमुखी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होणार असून भय म्हणजे वारंवार मृत्यू, या चंद्रशेखर यांच्या जीवनसाराचा संदेश त्यातून दिला जाणार आहे. चंद्रशेखर यांच्या लहानपणीच्या कामगिरीच्या कागदोपत्री असलेल्या नोंदींवर आधारित ‘गॅलक्सी रायटर्स प्रॉडक्शन’ने या मालिकेची निर्मिती केली आहे.

‘स्टार भारत’च्या प्रवक्त्याने सांगितले, “ज्यामुळे समाजात बदल घडेल,अशा कथानकाला आम्ही नेहमीच पाठिंबा देत असतो.आमच्या इतर चाकोरीबाहेरच्या मालिकांप्रमाणेच ‘चंद्रशेखर’ हीसुध्दा स्वातंत्र्यलढ्यातील एका वेगळ्या टप्प्याचा वेध घेणारी मालिका आहे. या मालिकेत चंद्रशेखर यांच्या बालपणातील बारीकसारीक घटना आणि गोष्टींवर झोत
टाकण्यात आला असून त्यांचे एक अत्यंत निडर आणि कट्टर स्वातंत्र्यसैनिकात रुपांतर करणा-या सर्व घटनांचे चित्रण यात करण्यात आले आहे.‘स्टार भारत’च्या ‘भुला दे डर, कुछ अलग कर’ या ब्रॅण्ड ध्येयाशी या मालिकेची संकल्पना अचूक जुळतेचंद्रशेखर यांच्याप्रमाणेच आपले ध्येय साध्य करताना येणा-या अडचणींच्या भीतीवर मात करण्याची प्रेरणा ही मालिका प्रेक्षकांना देईल, अशी आशा आम्हाला वाटते.”नामवंत पटकथालेखक आणि निर्माते अनिरुध्द पाठक म्हणाले, “भारतातील एका महान क्रांतिकारकाची जीवनगाथा सादर करणारी ही मालिका असली तरी चंद्रशेखर हे स्वत:च एक मोठे प्रेरणास्थान आहे. आपले सारे लक्ष जर आपल्या ध्येयावर केंद्रित झाले असेल, तर कोणत्याही अडचणीवर आपण मात करू शकतो, हेच या मालिकेतून दाखवून देण्यात आलं आहे.चंद्रशेखर हे एका दुर्गम आणि अगदी लहान खेड्यात राहात होते.परंतु आपल्या विलक्षण निर्धार, काटकपणा आणि धैर्याच्या जोरावर ते क्रांतिकारकांच्या सैन्याचे प्रमुख बनले, ही गोष्ट फारच थोड्या लोकांना ठाऊक आहे. ही माय-लेकांतील नात्याचीही कथा असून आपल्या मातेच्या शिकवणीमुळेच चंद्रशेखर यांचे भारतमातेवर कट्टर प्रेम बसले.

त्यांच्यातील निडरपणा आणि शौर्याचा मूळ स्रोत ही त्यांची आईच होती.‘स्टार भारत’च्या ‘भुला दे डर, कुछ अलग कर’ या ब्रॅण्ड ध्येयाशी चंद्रशेखर मालिका अगदी भक्कमपणे जोडली गेली आहे.”बालपणीच्या चंद्रशेखरची- चंदूची- भूमिका अयान झुबेर रेहमानी या बालकलाकाराने साकारली असून स्नेहा वाघ यांनी त्यांची आई जाग्राणीदेवीची भूमिका रंगविली आहे.चंदूचे वडील सीताराम तिवारी यांच्या भूमिकेत सत्यजित शर्मा आहेत.

Web Title: From March 12 to the 'Chandrasekhar' series receptionist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.