जाणून घ्या काय म्हणत आहेत, पहरेदार पिया की या मालिकेचे निर्माते शशी आणि सुमीत मित्तल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 07:55 IST2017-08-15T02:25:48+5:302017-08-15T07:55:48+5:30
पहरेदार पिया की या मालिकेच्या विरोधात सोशल मीडियावर एक कॅम्पेन सुरू करण्यात आले आहे. ही मालिका बंद करण्यात यावी ...

जाणून घ्या काय म्हणत आहेत, पहरेदार पिया की या मालिकेचे निर्माते शशी आणि सुमीत मित्तल
प रेदार पिया की या मालिकेच्या विरोधात सोशल मीडियावर एक कॅम्पेन सुरू करण्यात आले आहे. ही मालिका बंद करण्यात यावी म्हणून लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. या गोष्टीची गंभीर दखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ब्रॉडकास्टिंग कन्टेन्ट कम्प्लेन्ट्स काउन्सिलकडे (BCCC) तातडीने मालिकेबद्दल योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असेच सगळ्यांना वाटत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना नऊ वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांच्या असामान्य विवाहाची कहाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेद्वारे एक चुकीचा संदेश समाजात दिला जात असल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे. यावर या मालिकेचे निर्माते शशी आणि सुमीत मित्तल यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांच्यामते काहीही झाले तरी ते ही मालिका बंद करायला तयार नाहीत. ते सांगतात, आम्ही समाजामध्ये चुकीचा संदेश देत आहोत असे आम्हाला वाटत नाहीये. आम्ही आमच्या मालिकेत कोणतीही चुकीची गोष्ट दाखवलेली नाहीये असेच आम्हाला वाटते. आमच्या मालिकेचा एकही भाग पाहिलेला नसताना काही जण मालिकेवर प्रतिक्रिया देत आहेत, हे खूपच चुकीचे आहे. तुम्ही ही मालिका पाहात असल्यास तुम्हाला काहीही चुकीचे वाटणार नाही असे मी खात्रीने सांगू शकतो. मालिकेत फुलांनी सजवलेल्या बेडवर दिया आणि रतन यांना तुम्ही कसे काय दाखवू शकता असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. पण आम्ही त्यात काहीही आक्षेपार्ह दाखवलेले नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही मालिकेच्या कथानकात काहीही बदल करणार नाही आहोत तसेच आजपर्यंत आम्हाला कोणीही लीगल नोटिस पाठवलेली नाहीये. भविष्यात कोणी नोटिस पाठवली तर त्यावर आम्ही नक्कीच विचार करू.
लोकांचा या मालिकेच्या कथानकाला आक्षेप असला तरी या मालिकेचे निर्माते आपलीच पाठराखण करत असल्याचे यातून दिसून येत आहे.
लोकांचा या मालिकेच्या कथानकाला आक्षेप असला तरी या मालिकेचे निर्माते आपलीच पाठराखण करत असल्याचे यातून दिसून येत आहे.