​विद्या बालन शाळेत असताना या निर्मात्यावर होते तिचे क्रश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 17:38 IST2017-12-26T12:08:17+5:302017-12-26T17:38:17+5:30

शाळेत असताना प्रत्येकाचे कोण ना कोणावर तरी क्रश असते. अनेक मुलींना शालेय जीवनात एखादा अभिनेता आवडत असतो तर मुलांना ...

While Vidya Balan was at school this producer was crushed by her | ​विद्या बालन शाळेत असताना या निर्मात्यावर होते तिचे क्रश

​विद्या बालन शाळेत असताना या निर्मात्यावर होते तिचे क्रश

ळेत असताना प्रत्येकाचे कोण ना कोणावर तरी क्रश असते. अनेक मुलींना शालेय जीवनात एखादा अभिनेता आवडत असतो तर मुलांना एखादी अभिनेत्री. पण विद्या बालन शाळेत असताना ती कोणत्या अभिनेत्यावर अथवा अभिनेत्रीवर नव्हे तर एका निर्मात्यावर फिदा झाली होती. सिमी गरवालच्या कार्यक्रमात विद्याने या विषयी सांगितले देखील होते. विद्या शाळेत असताना तिला सत्यजीत रे खूपच आवडायचे. त्यांच्या कामाने ती भारावून गेली होती. विद्याने सिमी गरवालला मुलाखतीत सांगितले होते की, सत्यजीत रे हे अतिशय हुशार होते. ते दिग्दर्शन करत असत, ते खूप चांगले स्केच काढत असत, ते चांगले संगीत देत असत. त्यांच्या या सगळ्या गुणांमुळे मी अतिशय प्रभावित झाले होते. मी लहान असताना मला त्याच्यासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा होती. 

satyajit ray

सत्यजीत रे हे विद्याचे पहिले क्रश होते. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत देखील तिने त्यांच्याविषयी सांगितले होते. सत्यजीत रे यांना तिने एक पत्र लिहिले होते. त्या पत्राचा उल्लेख तिने या मुलाखतीत केला होता. तिने सांगितले होते की, मी १२-१३ वर्षांची असताना सगळ्यात पहिल्यांदा सत्यजीत रे यांचे लेखन वाचले होते. खरे तर तोपर्यंत त्यांचा एकही चित्रपट मी पाहिलेला नव्हता. पण ते लेखन वाचल्यापासूनच त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा होती. ते रुग्णालयात असताना त्यांना ऑस्करकडून लाइफ टाइम अॅचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी ते टिव्हीवर दाखवण्यात आले होते. हा पुरस्कार स्वीकारताना सत्यजीत रे प्रचंड अशक्त दिसत होते. त्यांची अवस्था मला पाहावत नव्हती. त्यामुळे गेट वेल सूनचा आशय असलेले एक पत्र मी त्यांच्यासाठी खास लिहिले होते. मी त्याच्यात लिहिले होते की, तुम्हाला अजून खूप सारे चित्रपट बनवायचे आहेत आणि तुम्हाला माझ्यासाठी देखील चित्रपट बनवायचा आहे. पण मी त्यांना पत्र पोस्ट करण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे माझे हे पत्र कायम माझ्याकडेच राहिले. ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांच्यापर्यंत ते पत्र पोहोचावे ही माझी इच्छा अपुरीच राहिली. 

Also Read : विद्या बालनने म्हटले, ‘विवाहित अभिनेत्री हिट चित्रपट देऊ शकत नाहीत’!

Web Title: While Vidya Balan was at school this producer was crushed by her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.