अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटातून ईशा अंबानी करणार बॉलिवूडमध्ये एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 21:21 IST2018-05-06T15:51:57+5:302018-05-06T21:21:57+5:30
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. ईशा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय ...

अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटातून ईशा अंबानी करणार बॉलिवूडमध्ये एंट्री!
द शातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. ईशा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या एका चित्रपटातून पडद्यावर पाऊल ठेवणार आहे. मात्र या चित्रपटात ती अभिनय करणार नसून, चित्रपटाची निर्माती म्हणून काम करणार आहे. होय, ईशा ‘केसरी’ या चित्रपटाला प्रोड्यूस करणार आहे. निर्माता करण जोहरसोबत ईशा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाला अगोदर करण जोहर आणि सलमान खान प्रोड्यूस करणार होते.
या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला असून, हा चित्रपट ‘बॅटल आॅफ सारागढी’वर आधारित असेल. सारागढी युद्ध १२ सप्टेंबर १८९७ मध्ये ब्रिटिश भारतीय सेना आणि अफगानी सेना यांच्यात झाले होते. हे युद्ध खैबर पखतुन्खवा येथे झाले होते. हा भाग सध्या पाकिस्तानात आहे. ब्रिटिश भारतीय सेनाच्या शिख पलटनमधील चौथ्या बटालियनमध्ये २१ शिख होते. ज्यांच्यावर १० हजार अफगानी सैनिकांनी हल्ला केला होता.
या बटालियनचे नेतृत्व करणारे हवालदार ईशर सिंह यांनी यावेळी अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला होता. ब्रिटिश भारतीय सैनिक आणि अफगानी सैनिकांमधील युद्धाच्या दोन दिवसानंतर अन्य भारतीय सेनेन त्या स्थानावर पुन्हा एकदा कब्जा मिळविला होता. सिख सैन्याकडून या युद्धाच्या आठवणी प्रित्यर्थ १२ सप्टेंबर हा दिवस ‘सारागढी दिवस’ म्हणून पाळला जातो.
दरम्यान, ईशा अंबानीविषयी सांगायचे झाल्यास ती यावर्षी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. डिसेंबर महिन्यात ती पीरामल ग्रुपचे चेअरमन अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल याच्याशी लग्न करणार आहे. आनंद आणि ईशा बºयाच काळापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोन्ही परिवार एकमेकांना गेल्या चार दशकांपासून ओळखतात. असे म्हटले जाते की, आनंदने ईशाला महाबळेश्वरमधील एका मंदिरात लग्नाची मागणी घातली होती.
या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला असून, हा चित्रपट ‘बॅटल आॅफ सारागढी’वर आधारित असेल. सारागढी युद्ध १२ सप्टेंबर १८९७ मध्ये ब्रिटिश भारतीय सेना आणि अफगानी सेना यांच्यात झाले होते. हे युद्ध खैबर पखतुन्खवा येथे झाले होते. हा भाग सध्या पाकिस्तानात आहे. ब्रिटिश भारतीय सेनाच्या शिख पलटनमधील चौथ्या बटालियनमध्ये २१ शिख होते. ज्यांच्यावर १० हजार अफगानी सैनिकांनी हल्ला केला होता.
या बटालियनचे नेतृत्व करणारे हवालदार ईशर सिंह यांनी यावेळी अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला होता. ब्रिटिश भारतीय सैनिक आणि अफगानी सैनिकांमधील युद्धाच्या दोन दिवसानंतर अन्य भारतीय सेनेन त्या स्थानावर पुन्हा एकदा कब्जा मिळविला होता. सिख सैन्याकडून या युद्धाच्या आठवणी प्रित्यर्थ १२ सप्टेंबर हा दिवस ‘सारागढी दिवस’ म्हणून पाळला जातो.
दरम्यान, ईशा अंबानीविषयी सांगायचे झाल्यास ती यावर्षी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. डिसेंबर महिन्यात ती पीरामल ग्रुपचे चेअरमन अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल याच्याशी लग्न करणार आहे. आनंद आणि ईशा बºयाच काळापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोन्ही परिवार एकमेकांना गेल्या चार दशकांपासून ओळखतात. असे म्हटले जाते की, आनंदने ईशाला महाबळेश्वरमधील एका मंदिरात लग्नाची मागणी घातली होती.