मला मारहाण केली, ब्रेकअपनंतरही फोन करुन त्रास दिला, ऐश्वर्या रायने सलमान खानवर केले होते अनेक गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 01:14 PM2023-04-29T13:14:48+5:302023-04-29T15:29:42+5:30

ऐश्वर्या राय आणि सलमान खान ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी होती. ब्रेकअपनंतर एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले होते.

Aishwarya rai had made many serious allegations against salman khan including assault after breakup | मला मारहाण केली, ब्रेकअपनंतरही फोन करुन त्रास दिला, ऐश्वर्या रायने सलमान खानवर केले होते अनेक गंभीर आरोप

मला मारहाण केली, ब्रेकअपनंतरही फोन करुन त्रास दिला, ऐश्वर्या रायने सलमान खानवर केले होते अनेक गंभीर आरोप

googlenewsNext

९० च्या दशकात  सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. या जोडीची प्रेमकहाणी 1997 मध्ये सुरू झाली. त्यावेळी सलमान खान सुपरस्टार झाला होता आणि ऐश्वर्या हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होती. दोघांनी संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती आणि दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

 सलमान खान आणि ऐश्वर्या राय दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावत असत. ते दोघे लग्न करणार असे वाटत असतानाच त्यांच्या नात्यात दुरावा आला होता.  सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय का घेतला याबाबत त्या दोघांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले. मात्र एका घटनेने मीडियाचे लक्ष वेधून घेतले होते. 

एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने सलमान खानसोबतच्या ब्रेकअपवर मौन सोडले आणि बॉलिवूडच्या सुलतानवर अनेक गंभीर आरोप केले. ब्रेकअपनंतर 27 सप्टेंबर 2002 रोजी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या रायने सलमान खानवर अनेक आरोप केले. अभिनेत्रीने तिच्या वक्तव्यात म्हटले होते की, ब्रेकअपनंतरही तो मला फोन करायचा आणि उलट-सुलट बोलायचा. माझ्या को-स्टारसोबत माझे अफेअर असल्याचा त्याला संशय होता. माझे नाव अभिषेकपासून शाहरुखपर्यंत सर्वांशी जोडले गेले.


ऐश्वर्याला मारायचा सलमान
मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने सांगितले होते की, सलमानने तिला अनेकदा मारहाणही केली होती. सुदैवाने माझ्या शरीरावर कोणत्याही खुणा नव्हत्या आणि काही घडलेच नसल्यासारखे मी शूटिंगला जात असे. तो मला खूप त्रास द्यायचा.मी त्याचा फोन उचलला नाही तेव्हा तो स्वत:ला दुखापत करुन घ्यायचा. ऐशने सलमानवर इतरही अनेक आरोप केले होते. ऐशने 2001 मध्ये मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत सलमानने घराबाहेर गोंधळ घातल्याचे सांगितले होते. त्यानंतर ऐशच्या वडिलांनीही सलमानविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर मिड डेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सलमानने सर्व आरोप फेटाळून लावले. मी तिला कधी मारहाण केली नाही, असे सलमानने मुलाखतीदरम्यान सांगितले होते. मी अनेकवेळा भावूक होतो, त्यावेळी मी स्वतःला दुखापत करुन घेतो. भिंतीवर डोकं आपटून मी स्वत:ला दुखापत करुन घेतली. मी इतर कोणाला दुखवू शकत नाही. मी फक्त सुभाष घई यांच्यावर हात उगारला पण दुसऱ्या दिवशी मी त्यांचीही माफी मागितली.
 

Web Title: Aishwarya rai had made many serious allegations against salman khan including assault after breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.