भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आकाश दीप याने केलेली भेदक गोलंदाजी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली होती. या संपूर्ण सामन्यात आकाश दीप याने मिळून दहा बळी टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीतपणे वाजवणाऱ्या आकाश दीप आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या संघर्षाची करुण कहाणी चर्चेत आली आहे.
आकाश दीपचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा प्रवास आहे विविध प्रकारच्या संघर्षांनी भरलेला आहे. आकाश दीप हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील हुतात्मा बाबू निशान सिंह यांचा वंशज आहे. बाबू निशान सिंह यांना इंग्रजांनी कैमूर येथील गुहेमधून पकडन सासाराम येथे तोफेच्या तोंडी दिले होते.