भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होत आहे. शुबमन गिल पहिल्यांदाच कर्णधार असणार आहे.
रोहित-विराटच्या निवृत्तीनंतरची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. त्यामुळे भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी शुबमन गिलला सल्ला दिला आहे.
'शुबमन गिलसारख्या युवा खेळाडूकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यातही हा दौरा इंग्लंडचा आहे. त्यामुळे ही जबाबदारी सोपी नक्कीच नसेल.'
'शुबमन गिल हा हुशार क्रिकेटर आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद ही जबाबदारी सोपी नसली तरीही तो या अनुभवातून खूप काही शिकू शकेल.'
'IPL मध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करताना गिल अतिशय संयमी आणि शांत असतो. त्याच्याकडे संयत भूमिका घेण्याची कला आहे.'
'गिल हा एक परिपक्व व्यक्ती आहे. त्याच्या आजुबाजुला युवा खेळाडूही असतील. त्यामुळे नवीन जबाबदारीतून त्याला खूप काही शिकायला मिळेल.'
'शुबमन गिल नव्या दमाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याने त्याचा वेळ घ्यावा. कुठल्याही गोष्टींची घाई करू नये' असा खास सल्ला रवी शास्त्रींनी दिला.