गेल्या काही वर्षांपासून टी-२० क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करत असलेला भारतीय संघ घरच्या मैदानावर होत असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत मोठ्या संकटात सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाचं सुपर-८ फेरीमधील गणित बिघडलं असून, उपांत्य फेरी गाठण्यासाठीची वाट अवघड झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ कोणत्या परिस्थितीत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठू शकतो, याचा घेतलेला हा आढावा.