Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ind vs Pak: "बाबरची विराटशी तुलना थांबवा", माजी क्रिकेटर संतापला; म्हणाला- "महान खेळाडू तोच असतो जो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:02 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. 'काँटे की टक्कर' होण्याची अपेक्षा असलेला सामना भारताने एकतर्फी जिंकला.

2 / 8

ईशान किशनच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने प्रथम १७५ धावांचा पल्ला गाठला. पण पाकिस्तानला केवळ ११४ धावाच करता आल्या, त्यामुळे पाकिस्तानचा पराभव झाला.

3 / 8

पाकिस्तानचा बाबर आझम अतिशय बेजबाबदार फटका खेळून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला ७ धावांवर बोल्ड केले. त्यानंतर आता माजी भारतीय क्रिकेटरने मत मांडले.

4 / 8

दिनेश कार्तिक म्हणाला, 'विराट कोहली आणि बाबर आझम यांची तुलना अनेक वर्षे केली जात आहे. पण मला ही तुलना सुरुवातीपासून कधीच मान्य नव्हती आणि पटतही नाही'

5 / 8

'बाबर आझम सामन्यात जो शॉट खेळला, तसा बेजबाबदार फटका कोहली कधीच खेळत नाही. बाबरचा फटका सामना जिंकवण्यासाठी खेळलेला दिसलाच नाही.'

6 / 8

'बाबरचा प्रयत्न केवळ मोठा फटका खेळण्याचा होता. कारण त्याला त्याचा स्ट्राईक रेट आणि रनरेट वाढवायचा होता. त्यासाठीच त्याने तसा बेजबाबदार शॉट खेळला.'

7 / 8

'दबावाच्या प्रसंगातच खेळाडूची महानता समजते. प्रत्येक सामना सोपा नसतो. मैदानात येताच बडे फटके खेळणे योग्य नाही. बाबर आझममध्ये मला ती परिपक्वता दिसत नाही.'

8 / 8

'बाबर आझम हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीच्या जवळपासही दिसत नाही. सध्याच्या क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा उत्तम टी२० खेळाडू आहे,' असेही कार्तिक म्हणाला.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीबाबर आजमपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ