Join us
Daily Top 2Weekly Top 5

"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:47 IST

Open in App
1 / 7

भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी संघ व्यवस्थापन आणि वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यातील 'विसंवादाच्या' चर्चांवर रोखठोक भाष्य केले.

2 / 7

रोहित-विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून आणि शुभमन गिलकडे वनडेचे कर्णधारपद गेल्यापासून ड्रेसिंग रुममधील मतभेदाची इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली होती.

3 / 7

या साऱ्या चर्चांवर उत्तर देताना कोटक म्हणाले, 'विराट आणि रोहित दोघेही उत्साहाने सराव करतात. त्यांना आपल्या तंदुरुस्तीची चांगली समज आहे. ते नेट प्रॅक्टिससाठी सर्वात आधी येतात.'

4 / 7

'रोहित-विराट अत्यंत अनुभवी, व्यावसायिक खेळाडू आहेत. त्यांना काय करायचे आहे हे त्यांना नीट ठाऊक आहे. ते आपला अनुभव इतर युवांशी सतत शेअर करत असतात.'

5 / 7

'मी नेहमीच रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मुख्य कोच गौतम गंभीर यांच्याशी सविस्तर चर्चा करताना पाहिलेले आहे. त्यांच्यात कुठल्याही पद्धतीचा विसंवाद नाही.'

6 / 7

विराट-रोहित केवळ सध्याच्या मालिकेबद्दलच नाही, तर २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या नियोजनाबाबतही गंभीरशी संवाद साधत असतात.'

7 / 7

टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माविराट कोहलीगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघ