Join us

Women’s Asia Cup 2022: आजपासून महिला आशिया चषकाचा रंगणार थरार; भारतीय संघ देणार विजयी सलामी? 

आजपासून महिला आशिया चषकाची सुरूवात होत असून पहिल्या सामना भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 12:18 IST

Open in App

सिल्हेट : बांगलादेशच्या धरतीवर आजपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. १ ते १६ ऑक्टोंबरदरम्यान या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रंगेल. बांगलादेशच्या यजमानपदात सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket stadium) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एकूण ७ संघामध्ये किताबासाठी लढत होणार आहे. आज या स्पर्धेत स्पर्धेचा प्रबळ दावेदार भारत आणि श्रीलंका (INDW vs SLW) हे संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरूवात होईल.  

७ संघांमध्ये रंगणार 'सामना' आजपासून अर्थात १ ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगत आहे. आयसीसीने अलीकडेच फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील २ आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले होते. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी होणार आहेत. हे सर्व संघ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बांगलादेश येथे पोहचले होते. 

आजपासून रंगणार थरार 

आशिया चषक २०२२ साठी भारतीय महिला संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सब्बिनेनी मेघना, रिचा घोष, स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, के.पी. नवगिरे. 

राखीव खेळाडू - तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर.

भारतीय महिला सातव्यांदा जिंकणार किताब? २०१२ पासून महिला आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. शेवटच्या वेळी हे २०१८ मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, जिथे बांगलादेशने सहा वेळच्या चॅम्पियन भारताचा शेवटच्या चेंडूवर पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते.  

 

टॅग्स :एशिया कप 2022भारतीय महिला क्रिकेट संघस्मृती मानधनाभारत विरुद्ध श्रीलंकाबांगलादेश
Open in App