भारतीय क्रिकेटमध्ये यशस्वी कर्णधाराच्या रुपात उदयास येणारा चेहरा अन् IPL मधील फ्रँचायझी पंजाब किंग्जचा 'सरपंच' श्रेयस अय्यर याला पुन्हा एकदा ट्रॉफीनं हुलकावणी दिली आहे. टी-२० मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामातील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबई फालकोन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखालील एमएससी मराठा रॉयल्स संघाने फायनल बाजी मारली अन् आयपीएल ट्रॉफी उचलण्याची संधी हुकल्यावर ९ दिवसांत दुसऱ्यांदा श्रेयस अय्यरच्या हातून ट्रॉफी निसटली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फायनलनंतरची निराशा अन् त्यात मनं जिंकणारं ते वक्तव्य
९ दिवसांत दुसरी ट्रॉफी हातून निसटल्यावर श्रेयस अय्यर निराश झाल्याचे दिसून आले. फायनल गमावल्यावर तो म्हणाला की, हे खूप हेक्टिक आहे. ज्यावेळी संघ पराभूत होतो त्यावेळी ती गोष्ट मनाला सतावत राहते. हा सामना पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं मैदानात आले होते. संघाला चीअर करणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. संघातील सर्वांनाची सर्वोत्परी प्रयत्न केला. फायनलपर्यंत आम्ही फक्त एकच सामना गमावला. त्यामुळे या पराभवानंतर कुणा एका दोघांना दोष देता येणार नाही. ते म्हणजे पाठीत खंजीर खुपसल्यासारखे होईल. ती गोष्ट मला अजिबात पटत नाही, असे श्रेयस अय्यरनं म्हटले आहे.
क्रिकेटच्या पंढरीत 'पंजा' मारण्याआधी पॅट कमिन्सनं केली ५० वर्षांपूर्वीची ती पुनरावृत्ती
नशीब फुटकं निघालं, पण श्रेयस अय्यरनं नेतृत्वाची खास झलक दाखवत जिंकलं
क्रिकेटच्या मैदानातील पराभवानंतर बॅऱ्याचदा संघाचा कर्णधार बॅटिंग, बॉलिंग किंवा फिल्डिंगमध्ये उणावांकडे बोट दाखवत पराभवाचे खापर आपल्याच ताफ्यातील गड्यांवर फोडताना दिसते. पण श्रेयस अय्यर हा वेगळ्या धाटणीतील कर्णधार आहे. संघातील खेळाडूंवर पराभवाचं खापर फोडणं ही गोष्ट त्याला पाठीत खंजीर खुपसल्यासारखी वाटते. फायनल गमावल्यावर त्याचे हे बोल आगामी काळात तो कॅप्टन्सीत एक वेगळी छाप सोडण्यासाठी तयार असल्याची झलक दाखवणारा आहे.
तिसऱ्या हंगामात सिद्धेश लाडचा मराठा रॉयल्स संघ ठरला चॅम्पियन
मॅच बद्दल बोलायचं तर टी-२० मुंबई लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील फायनल लढतीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील सोबो मुंबई फालकोन्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात १५७ धावा केल्या होत्या. सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखालील एमएससी मराठा रॉयल्स संघाने १९.२ षटकात पाच विकेट राखून हे आव्हान पार करत ट्रॉफीवर नाव कोरले.