IPL 2026 स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या जागी कॅप्टन्सीची जबाबदारी खांद्यावर पडलेल्या सूर्यकुमार यादवनं संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्सला सावरणारी खेळी केली. अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने सलामीवीर रायन रिकल्टन आणि तिलक वर्माच्या रुपात अवघ्या १८ धावांवर दोन विकेट्स गमावल्या. संघ अडचणीत असताना सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा जोडी जमली. रोहित शर्माला अक्षर पटेल याने ३५ धावांवर चालते केल्यावर सूर्यानं अर्धशतक साजरे केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्धशतकानंतर तो पुढच्याच चेंडूवरच फसला!
सूर्यकमार यादवनं ३६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी साकारली. आयपीएल कारकिर्दीतील ३० वे अर्धशतक झळकावल्यावर अखेरच्या षटकापर्यंत मैदानात थांबून तो दिल्ली कॅपिटल्ससमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारणारी खेळी करेल, असे वाटत होते. पण चौकाराने अर्धशतकाला गवसणी घातल्यावर लुंगी एनिगडीच्या १६ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तो पायचित झाला. त्याच्या खेळीला लागलेला ब्रेक हा MI साठी एक मोठा धक्काच होता.
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
९ डावानंतर अर्धशतकी खेळी
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव तिसऱ्यांदा MI चं नेतृत्व करताना दिसला. याआधी दोन सामन्यात त्याने MI चं नेतृत्व केले असून १ विजय आणि एक पराभव असा त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड आहे. मागील ९ डावानंतर त्याच्या भात्यातून अर्धशतक पाहायला मिळाले. याआधी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावले होते. या खेळीनंतर सातत्याने तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मात्र आता IPL च्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्या बॅटिंगची खास झलक दाखवून दिली.