IPL 2025 Qualifier 2 MI vs PBSK R Ashwin Shocking Statement On Mumbai Indians : आयपीएल २०२५ च्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघ फायनलच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या या संघानं एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाला पराभूत करत क्वालिफायर २ मध्ये आपले स्थान पक्के केले. पंजाब विरुद्धची लढाई जिंकली तर ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध फायनल खेळताना दिसतील. एका बाजूला मुंबई इंडियन्स हा अडथळा पार करून आयपीएलमध्ये जेतेपदाचा विक्रमी षटकार मारणार का? अशी चर्चा रंगत असताना आर. अश्विन याला मुंबई इंडियन्सलाच नेहमी नशिबाची इतकी साथ कशी मिळते? असा प्रश्न पडला आहे. जाणून घेऊयात आर. अश्विन नेमकं काय म्हणालाय त्यासंदर्भातील खास गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MI ला नेहमी नशिबाची साथ कशी मिळते?
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्माला दोन वेळा जीवनदान मिळाले. याचा फायदा उठवत त्याने मोठी खेळीही केली. त्यामुळे MI ला या सामन्यात कुठंतरी नशिबाची साथ लाभली, अशीही चर्चा रंगू लागली. या मुद्यावरुनच अश्विनला नेहमी मुंबई इंडियन्सलाच नशिबाची साथ कशी मिळते? असा प्रश्न पडलाय. हा प्रश्न उपस्थितीत करताना आर. अश्विन याने आयपीएलमधील याआधीचा एक किस्साही शेअर केला आहे.
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
अश्विननं शेअर केला २०१८ च्या हंगामातील किस्सा
मुंबईच्या नशिबावर भाष्य करताना जुन्या आठवणीला उजाळा देताना अश्विन म्हणाला आहे की, २०१८ च्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब यांच्यात सामना झाला. त्यावेळी मी पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करत होतो. या सामन्यात १३ षटकात ८० धावा असताना मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ तंबूत परतला होता. ते मॅचमध्ये नव्हते. अचानक लाइट जाते. फ्लडलाइट्सच्या व्यत्ययामुळे थांबलेला सामना २० मिनिटांच्या ब्रेकनंतर सुरु होतो. केरॉन पोलार्ड येतो अन् तो धमाकेदार खेळी करतो. मुंबई इंडियन्सचा संघ या सामन्यात जवळपास १८०-२०० धावा करतो. कधी कधी नशिबाची साथ मिळते. पण मुंबई इंडियन्सच्या बाबतीत हे अनेकदा घडताना पाहायला मिळाले आहे. त्यांनी एवढ नशिब कसं काय काढलंय ते शोधायला हवं, असेही तो आपल्या युट्यूब चॅनेलवरुन गप्पा गोष्टी करताना म्हणाला आहे.