Join us

IPL 2025 : असा आहे मुंबई इंडियन्सचा Qualifier 2 मधील रेकॉर्ड! पंजाबनंही एकदा मैदान मारलंय, पण..

MI नं क्वालिफायर २ सामना जिंकल्यावर दोन्ही वेळा उंचावली होती IPL ट्रॉफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 14:59 IST

Open in App

IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Record : पाच वेळचा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेला पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलच्या १८ व्या हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ ३ जूनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध यंदाच्या हंगामातील फायनल खेळताना दिसेल. दोन्ही संघ आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून स्पर्धेचा भाग राहिले आहेत. इथं एक नजर टाकुयात आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्या संघाने किती वेळा प्लेऑफ्समधील क्वालिफायर २ चा सामना खेळलाय अन् त्यात कसा राहिलाय त्यांचा रेकॉर्ड्स यासंदर्भातील सविस्तर माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

MI नं चार वेळा खेळलाय क्वालिफायर २ चा सामना; असा आहे त्यांचा रेकॉर्ड

मुंबई इंडियन्सच्या संघाने २०११ च्या हंगामात पहिल्यांदा क्वालिफायर २ चा सामना खेळला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं या सामन्यात त्यांना ४३ धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी  संघाने दमदार कमबॅक केले. २०१३ च्या हंगामात MI नं क्वालिफायर २ च्या लढतीत राजस्थान रॉयल्सला शह देत फायनल गाठली. अन् रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिली आयपीएल ट्रॉफीही जिंकली होती. २०१७ च्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने क्वालिफायन २ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत फायनल गाठली. यावेळीही संघाने ट्रॉफी उंचावल्याचा रेकॉर्ड आहे. २०२३ च्या हंगामात चौथ्यांदा मुंबई इंडियन्स संघ क्वालिफायर २ चा सामना खेळताना दिसला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने त्यांना पराभूत केले होते. 

IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार

पंजाबचा संघ दुसऱ्यांदा खेळणार क्वालिफायर २ चा सामना

पंजाब किंग्जच्या संघाला यंदाच्या हंगामात थेट फायनल गाठण्याची संधी होती. पण पहिल्या क्वालिफायर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु समोर संघ अपयशी ठरला. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा ते क्वालिफायर २ ची लढत खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. याआधीत २०१४ मध्ये त्यांनी क्वालिफायर २ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला मात देत फायनल गाठल्याचे पाहायला मिळाले होते. पण कोलकाताच्या संघाने फायनल बाजी मारल्यामुळे त्यांचे पहिल्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले होते. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हे स्वप्न साकार करायचे असेल तर आधी संघाला MI विरुद्धची लढाई जिंकावी लागेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सपंजाब किंग्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट