Join us

IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल

विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे टीम इंडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 20:00 IST

Open in App

India vs England Test Series Gautam Gambhir Shubman Gill Press Conference : आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज आहे. या दौऱ्यात भारत  आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.  इंग्लंडला दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल आणि संघाचे कोच गौतम गंभीर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शुबमन गिल आणि गंभीर यांनी इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.

रोहित विराटच्या अनुपस्थितीबद्दल काय म्हणाला गिल?

इंग्लंड दौऱ्याआधी  विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नव्या कॅप्टनला या दोन दिग्गजांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शुबमन गिल म्हणाला की, एवढ्या मोठ्या दिग्गजांची उणीव भरून काढणं कठीण आहे. पण त्यांच्या अनुपस्थितीचा कोणताही अतिरिक्त दबाव आमच्यावर नाही. मला माझ्या संघावर भरवसा आहे. असेही तो म्हणाला आहे.

 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५शुभमन गिलगौतम गंभीर