Sourav Ganguly Reacts On Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असणारे सर्व संबंध तोडले पाहिजेत, अशी भूमिका भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे २०१२-१३ पासून भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला ब्रेक लागला आहे. पण आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला मिळते. आता ते ही नको, अशा आशयाचे वक्तव्य करत गांगुलीने या स्पर्धेतही पाक विरुद्ध खेळू नये, असे म्हटले आहे.
पाक विरुद्ध खेळूच नये! नेमकं काय म्हणाला गांगुली?
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
पहलगाम दहशवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात संतप्त प्रतिक्रिया
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर निशाणा साधल्याची घटना मंगळवारी २२ एप्रिल रोजी घडली. या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला. २० हून अधिक पर्यटक जखमी झाले. या घटनेनंतर देशभरातून पाकिस्तानवर राग व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्रिकेट संबंधाला थारा मिळू नये, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.