IND vs SA : "क्रिकेटला गृहित धरू नका"; पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार रिषभ पंत?

भारतीय संघाच्या पराभवानंतर रिषभ पंत याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सर्वोत्तम खेळ दाखवला आणि आम्ही प्रत्येक वेळी कमी पडलो हे मान्य केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:37 IST2025-11-26T13:36:07+5:302025-11-26T13:37:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA Hurt Rishabh Pant Doesn't Mince Words After South Africa Humiliate India 2-0 At Home Do not take cricket for granted | IND vs SA : "क्रिकेटला गृहित धरू नका"; पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार रिषभ पंत?

IND vs SA : "क्रिकेटला गृहित धरू नका"; पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार रिषभ पंत?

IND vs SA Rishabh Pant After  India 2-0 At Home Test Loss : गुवाहाटीच्या मैदानात भारतीय संघाला कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील ४०८ धावांनी विजय मिळवत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २५ वर्षानंतर भारतीय मैदानात आपलं वर्चस्व दाखवून दिलं. कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यात एका बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. याउलट चित्र भारतीय संघाबाबत घडलं. मैदानासोबत खेळपट्टीचा मिजास बदलला पण टीम इंडियाचा फ्लॉप शोचा सिलसिला कायम राहिला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

घरच्या मैदानातील लाजिरवाण्या पराभवावर काय म्हणाला पंत?

भारतीय संघाच्या पराभवानंतर रिषभ पंत याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सर्वोत्तम खेळ दाखवला आणि आम्ही प्रत्येक वेळी कमी पडलो हे मान्य केले. सामन्यानंतर भारतीय कसोटी संघाचा कार्यवाहू कर्णधार पंत म्हणाला की, ' हा पराभव निराशाजनक आहे. सांघिक कामगिरी आणखी चांगली करण्याची गरज होती. प्रतिस्पर्ध्यांना उत्तम खेळ केला. या विजयाचे श्रेय त्यांना  द्यायलाच पाहिजे. आम्हाला मानसिकृष्ट्या आणखी स्पष्टतेसह मैदानात उतरण्याची गरज होती. या पराभवातून खूप काही शिकायला मिळाले. त्यांनी मालिकेत पूर्ण वर्चस्व गाजवलं, पण तुम्ही क्रिकेटला कधीही गृहीत धरू शकत नाही. आपण घरच्या मैदानावर खेळत होतो आणि काही क्षणी आपण सामन्यात पुढेही होतो. संधी मिळाल्या, पण संधीच सोन करता आल नाही. त्याची मोठी किंमत संपूर्ण मालिकेत मोजावी लागली, असे पंत म्हणाला आहे.
 

Web Title : IND vs SA: क्रिकेट को हल्के में न लें, हार के बाद बोले पंत

Web Summary : भारत की घरेलू श्रृंखला में हार के बाद ऋषभ पंत ने दक्षिण अफ्रीका के बेहतर प्रदर्शन को स्वीकार किया। उन्होंने मानसिक स्पष्टता में सुधार और हार से सीखने की आवश्यकता पर जोर दिया। पंत ने कहा कि वे अवसरों का लाभ नहीं उठा सके, जिसकी उन्हें श्रृंखला में कीमत चुकानी पड़ी।

Web Title : IND vs SA: Don't Take Cricket for Granted, Says Pant After Loss

Web Summary : Rishabh Pant acknowledged South Africa's superior performance after India's home series loss. He emphasized the need for improved mental clarity and learning from the defeat. Pant stated that they couldn't capitalize on opportunities, which cost them the series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.