Join us

IND vs SA, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या सामन्याची वेळ बदलणार; जाणून घ्या IMP अपडेट्स

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका याच्यांतला दुसरा ट्वेंटी-२० सामना आज गुवाहाटीच्या बसपरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 15:38 IST

Open in App

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका याच्यांतला दुसरा ट्वेंटी-२० सामना आज गुवाहाटीच्या बसपरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारताला घरच्या मैदानावर एकदाही आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकता आलेली नाही. पण, रोहित शर्मा अँड टीमला आजची लढत जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. पहिल्या ट्वेंटी-२० त भारताने सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहने मालिकेतून माघार घेतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यात आज भारताच्या ऐतिहासिक मालिका विजयाच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

New Rule! वर्ल्ड कप स्पर्धेत हे ५ नवीन नियम ठरतील निर्णायक; कर्णधारांची कसोटी

अर्शदीप सिंग, दीपक चहर यांनी दमदार गोलंदाजी केल्यानंतर सूर्यकुमार यादव  व लोकेश राहुल यांनी भारताचा विजय पक्का केला होता. आफ्रिकेने पहिल्या सामन्यात निम्मा संघ ९ धावांवर गमावला होता, परंतु तरीही त्यानी १०० + धावा केल्या. सूर्यकुमार व लोकेश यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना भारताचा विजय पक्का केला होता. त्याही सामन्यात जसप्रीत खेळला नव्हता, त्यानंतर BCCI ने तो मालिकेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्याच्या जागी मोहम्मद सिराजची निवड केली गेली आहे. पण, आजच्या सामन्यात हर्षल पटेलच्या जागी त्याला संधी मिळतेय का याची उत्सुकता आहे. 

आजच्या सामन्यावर पावसाचे सावटगुवाहाटी येथे आज सायंकाळी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथे लख्ख सूर्यप्रकाश असणार आहे, परंतु ७ नंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यादरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत जर मैदान वेळेत सुकवता आले नाही, तर सामना रद्द करावा लागू शकतो किंवा षटकांची संख्या कमी केली जाऊ शकते. याआधी २०२०मध्ये भारत-श्रीलंका यांच्यातला सामना ओल्या खेळपट्टीमुळे रद्द करावा लागला होता.   

 

पाऊस  पडल्यास सायंकाळी ६.३० वाजता होणारी नाणेफेक पुढे ढकलली जाऊ शकते आणि त्याचा परिणाम सामन्याच्या वेळेवरही पाहायला मिळेल. नियोजित वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता हा सामना सुरू होणार आहे. आयोजकांनी सर्व तयारी केल्याचा दावा केला आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, लंडनवरून कव्हर मागवलेले आहेत, त्यामुळे खेळपट्टीवर पाणी किंवा दव जमा होण्याचा प्रश्नच नाही. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकागौहतीपाऊस
Open in App