Join us

मुंबईकराची चूक काय? या माजी क्रिकेटरलाही वाटतंय की, सरफराज खानवर अन्याय झालाय

आता माजी क्रिकेटरनं सरफराज खानकडून 'बोलंदाजी' करताना बीसीसीआय निवडकर्त्यांना बाउन्सर मारलाय. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:49 IST

Open in App

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज आहे. या मालिकेसाठी सरफराज खानला संघात स्थान मिळालेले नाही. ज्या संघातून वगळण्यात आलं त्या संघाविरुद्ध सरफराज खानने ७६ चेंडूत शतक साजरे केले. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्याआधी भारत अ विरुद्ध भारत यांच्यात रंगलेल्या इन्ट्रा स्क्वॉड सामन्यात सरफराज खान याने शतकी खेळीसह मैफील लुटली. त्याची ही खेळी संघातून डावलणाऱ्या निवडकर्त्यांना चपराकच होती. त्यात आता माजी क्रिकेटरनं सरफराज खानकडून 'बोलंदाजी' करताना बीसीसीआय निवडकर्त्यांना बाउन्सर मारलाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

माजी क्रिकेटरचा निवडकर्त्यांना प्रश्न

सरफराज खान याने भारत 'अ' संघाकडून खेळताना सिराज, बुमराह सारख्या गोलंदाजांचा सामना करताना आपल्या फलंदाजीतील कौशल्य दाखवले. त्याच्या या खेळीचा दाखला देत माजी क्रिकेटर आणि विद्यमान समालोचक, क्रिकेट समीक्षक आकाश चोप्रा याने बीसीसीआय निवडकर्त्यांना तिखट प्रश्न विचारला आहे. जर तुम्हाला सरफराज खानच्या टेक्निकवर भरवसा नाही तर त्याला इंग्लंड दौऱ्यावरील भारत 'अ' संघात तरी स्थान कशाला दिले? या प्रश्नासह आकाश चोप्राने बीसीसीआय निवडकर्त्यांना बाउन्सर मारला आहे.  मुंबईकराने संघातून वगळण्यासारखी कोणतीही चूक केलेली नाही, असेही आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे.  

'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही नेलं, पण...

सरफराज खान याने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघाविरुद्धच्या इंट्रा स्क्वॉड लढतीत १५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने शतकी खेळी केली. याआधी इंग्लंड लायन्स विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून ९२ धावांची कडक खेळी पाहायला मिळाली होती. सरफराज खान हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील कसोटी मालिकेसाठीही टीम इंडियाचा भाग होता. पण त्यावेळीही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. मुंबईकर बॅटरची कोणतीही चूक नसताना त्याला डावलण्यात आले आहे, असे मत आकाश चोप्रा याने व्यक्त केले आहे.  

माजी क्रिकेटर आकाश चोप्रानं नेमकं काय म्हटलंय?

तो धावा करू शकतो या भरवशावरच तुम्ही त्याची भारतीय 'अ संघात निवड केली आहे. मग त्याला टीम इंडियातही स्थान मिळायलाच हवे. त्याचं काय चुकलंय? त्याने बंगळुरुच्या सामन्यात शतकी खेळी केली. त्यानंतर तो दोन सामन्यात अपयशी ठरला. पण त्यावेळी अन्य फलंदाजही अपयशी ठरले होते. ऑस्ट्रेलियातही त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्यासोबत जे काही घडतंय ते कुणालाही चुकीचं वाटू शकते. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५सारा अली खानभारत विरुद्ध इंग्लंडअजित आगरकरभारतीय क्रिकेट संघ