Join us  

ICC World Test Championship : कसोटी 'वर्ल्ड कप'च्या शर्यतीत टीम इंडियाची भक्कम आघाडी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 12:19 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात रोहित शर्मानं दोन्ही डावांत शतकी खेळी केली. मयांक अग्रवालनं द्विशतक झळकावलं.  आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी पहिल्या व दुसऱ्या डावात एकूण अनुक्रमे आठ व 6 विकेट्स घेतल्या. शिवाय 70 धावाही केल्या. भारतीय संघाने उत्तम सांघिक खेळाचे दर्शन घडवले. 

चौथ्या डावात 395 धावांच पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 191 धावांत तंबूत परतला. मोहम्मद शमीनं 10.5 षटकांत 35 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. जडेजानंही चार विकेट्स घेतल्या. या विजयासह भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे. भारताने विजय मिळवून खात्यात आणखी 40 गुण जमा केले आहेत. आता 160 गुणांसह भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना दोन विजय आणि एक अनिर्णित निकालानंतर प्रत्येकी 56 गुणांसह अनुक्रमे पाचव्या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका प्रत्येकी 60 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. 

कोण किती सामने खेळणार ?या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे संघ पात्र ठरले आहेत. या स्पर्धेंतर्गत इंग्लंड 22 सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( 19), भारत ( 18), दक्षिण आफ्रिका ( 16), वेस्ट इंडिज ( 15), न्यूझीलंड ( 14), बांगलादेश ( 14), पाकिस्तान ( 13) आणि श्रीलंका (13) यांचा क्रमांक येतो.  

कशी होणार गुणांची विभागणी?आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक मालिकेत 120 गुण देण्यात येणार आहेत. 120 गुणांची दोन सामन्यांत विभागणी होईल. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी संघाला 40 गुण मिळतील. अनिर्णित व बरोबरीच्या निकालांसाठी दोन्ही संघांना प्रत्येकी अनुक्रमे 13.3 व 20 गुण दिले जातील. 4 सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 30 गुण घेईल, तर अनिर्णित निकालासाठी 10 व बरोबरीच्या निकालासाठी 15 गुण मिळतील. पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 24, अनिर्णित निकाल 8 आणि बरोबरीच्या निकालासाठी 12 गुण मिळतील.  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघ