India vs England Test Series : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जून पासून सुरुवात होत आहे. या आव्हानात्मक मालिकेआधी भारतीय 'अ' संघातून काही खेळाडूंनी इंग्लंड लायन्स विरुद्धच्या दोन अनौपचारिक कसोटी सामन्याच्या माध्यमातून तयारी केली. याशिवाय भारत 'अ' आणि भारतीय संघ यांच्यातही इंट्रा स्क्वॉड सराव सामना खेळवण्यात आला. सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, अंशुल कंबोज, खलील अहमद आणि हर्षित राणा यासारख्या स्टार खेळाडूंना भारत 'अ' संघात स्थान देण्यात आले होते. यातील एका गड्याची शेवटच्या क्षणी टीम इंडियात एन्ट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोण आहे तो खेळाडू ज्याला शेवटच्या क्षणी मिळू शकते टीम इंडियात संधी? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या गड्याची शेवटच्या क्षणी होणार टीम इंडियात एन्ट्री
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २० जूनला लीड्सच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ १७ जूनला लीड्स येथे पोहचणार आहे. दुसरीकडे भारतीय 'अ' संघ मायदेशी परतणार आहे. Revsportz च्या वृत्तानुसार, भारतीय 'अ' संघाचा भाग असलेला जलदगती गोलंदाज हर्षित राणा याला मुख्य संघासोबत थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची शेवटच्या क्षणी टीम इंडियात वर्णी लागू शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण, इंग्लंडमध्ये अशी राहिलीये कामगिरी
हर्षित राणा याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतून टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पण केले होते. भारत 'अ' संघाकडून इंग्लंड लायन्स विरुद्धच्या सामन्यात तो एक सामना खेळला. या अनौपचारिक कसोटी सामन्यात त्याला एकमेव विकेट मिळाली होती.
इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.