टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या फायनलमध्ये न्यूझीलंडला धूळ चारून तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय संघासाठी बीसीसीआयने आपला खजिना उघडला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियासाठी १३१ कोटी रुपयांच्या भव्य इनामी रक्कमेची घोषणा केली आहे. ही रक्कम २०२४ मधील बक्षीसापेक्षाही मोठी आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेली ही रक्कम केवळ खेळाडूंसाठीच नाही, तर संपूर्ण टीम मॅनेजमेंटसाठी आहे. याचे वाटप साधारणपणे अशाप्रकारे केले जाण्याची शक्यता आहे. मुख्य १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ ते ७ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. संघात असलेल्या ४ राखीव खेळाडूंनाही १ ते २ कोटींचा हिस्सा मिळेल. मुख्य प्रशिक्षक आणि इतर महत्त्वाच्या प्रशिक्षकांना (उदा. बॅटिंग, बॉलिंग कोच) मोठे मानधन दिले जाईल. तसेच फिजियो, ट्रेनर, थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट आणि इतर मदतनीस कर्मचाऱ्यांमध्ये उर्वरित रक्कम विभागली जाईल.
निवड समितीच्या सदस्यांनाही त्यांच्या योगदानाबद्दल बोनस दिला जाणार आहे.
ICC चे बक्षीस वेगळे
अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केल्यानंतर, भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेजाहीर केलेल्या स्पर्धेच्या बक्षीस रकमेची रक्कम २.३४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (२१.५ कोटी रुपये) मिळवले आहेत. तर उपविजेत्या न्यूझीलंडला १.१७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (१०.७५ कोटी रुपये) मिळाले. टीम इंडियाला या व्यतिरिक्त बीसीसीआयची रक्कम मिळणार आहे.
२०२४ मध्ये किती दिलेले...
२०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा तत्कालीन सचिव जय शाह यांनी १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र, यंदा ही रक्कम १३१ कोटी रुपयांवर नेण्यात आली आहे.