Join us

Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल

भारतीय संघाचा विजयी सिलसिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 23:38 IST

Open in App

India vs Bangladesh: आशिया चषक स्पर्धेतील सलग पाचव्या विजयासह भारतीय संघाने फायनलमध्येे प्रवेश केला आहे.  पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघानं बांगलादेशच्या संघासमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १२७ धावांवर आटोपला. टीम इंडियाने ४१ धावांनी विजय नोंदवत फायलमध्ये धडक मारली. या निकालानंतर आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील लढतीला सेमीच स्वरुप आले आहे. यातील विजेता संघ २८ सप्टेंबरला टीम इंडियाविरुद्ध फायनल खेळताना दिसेल. 

टॅग्स :आशिया कप २०२५