अ‍ॅडलेडनंतर ज्यांनी आमच्यावर शंका घेतली, त्यांनी डोळे उघडून पाहा - विराट कोहली 

इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी ही दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती यादी पाहून टीम इंडियाचं काही खरं नाही, असाच अंदाज सर्वांना लावला होता.

By स्वदेश घाणेकर | Published: January 19, 2021 04:02 PM2021-01-19T16:02:24+5:302021-01-19T16:02:49+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS : To everyone who doubted us, stand up and take notice: Virat Kohli   | अ‍ॅडलेडनंतर ज्यांनी आमच्यावर शंका घेतली, त्यांनी डोळे उघडून पाहा - विराट कोहली 

अ‍ॅडलेडनंतर ज्यांनी आमच्यावर शंका घेतली, त्यांनी डोळे उघडून पाहा - विराट कोहली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
  • १९ डिसेंबर २०२० - अॅडलेड कसोटीत टीम इंडियाचा डाव ३६ धावांवर गडगडला 
  • १९ जानेवारी २०२१ - भारतानं गॅबा कसोटीत ऐतिहासिक विजयाची नोंद केली

 

India vs Australia, 4th Test Day 5 :  या महिन्याभरातील टीम इंडियाचा प्रवास खरंच सर्वांना थक्क करणारा आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंवर विश्वास दाखवून अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) नेतृत्वकौशल्यानं टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारतानं गॅबा कसोटीत ३ विकेट्स राखून विजय मिळवताना चार सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. अॅडलेड कसोटीतील '३६'च्या आकड्यानंतर टीम इंडिया हा चमत्कार करून दाखवले, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. पण, टीम इंडियानं ते करून दाखवलं. मायदेशात परतलेल्या विराट कोहलीनं ( Virat Kohli) टीम इंडियाच्या अविश्वसनीय विजयानंतर टीकाकारांचे कान टोचले.  

अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली युवा ब्रिगेडनं कांगारूंना सळो की पळो करून सोडलं. भारतानं मालिकेत फक्त कमबॅक केले नाही, तर २-१ असा विजय मिळवून दिला.  शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले. शुबमन गिलने १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावा केल्या. पुजारानं २११ चेंडूंचा सामना करताना ५६ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभनं आक्रमक खेळ करताना १३८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ८९ धावा चोपल्या. 

विराट कोहलीनं पोस्ट लिहिली की,'' What a Win!!!, अॅडलेड कसोटीनंतर आमच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, त्या प्रत्येकानं उभे राहा आणि लक्षात घ्या. अनुकरणीय कामगिरी, परंतु धैर्य आणि निर्धार या संपूर्ण प्रवासात सोबत होता. सर्व खेळाडूंचे व व्यवस्थापनाचे कौतुक. या ऐतिहासिक विजयाचा आनंद लुटा.''

Web Title: IND vs AUS : To everyone who doubted us, stand up and take notice: Virat Kohli  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.