Ashish Shelar : "अर्थसंकल्पात पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे; पानचट, पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:25 IST2022-03-11T17:15:32+5:302022-03-11T17:25:01+5:30
BJP Ashish Shelar And Maharashtra Budget 2022 : "पुणे जिल्ह्यामधील सगळ्या प्रकल्पांना निधी दिला आणि मुंबईला मात्र भोपळा असे चित्र आहे."

Ashish Shelar : "अर्थसंकल्पात पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे; पानचट, पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प"
मुंबई - राज्य सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प हा पंचसूत्रीचा विकासाच्या आधारावर नसून तो मांडल्यानंतर लक्षात येते की, पानचट, पचपचीत आणि प्रतिगामी असा अर्थसंकल्प आहे. हा स्व-राज्याचा अर्थसंकल्प वाटत असून स्व-हिताचा अर्थसंकल्प आहे. आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप काही केलं असं सांगितले गेले पण प्रत्यक्षामध्ये आर्थिक पाहणी अहवालात बघितलं ही, कोरोना काळामध्ये शेतकरी खासगी सावकाराकडे वळला हे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चकार शब्द सुद्धा या अर्थसंकल्पात काढला नाही असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
अर्थसंकल्प राज्याचा पण जिल्हा नियोजनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे दिसते आहे. अर्थसंकल्प पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे अशा पद्धतीचा आहे. पुणे जिल्ह्यामधील सगळ्या प्रकल्पांना निधी दिला आणि मुंबईला मात्र भोपळा असे चित्र आहे. कुणाच्या विरोधात आम्ही नाही पण पुणे जिल्ह्यामध्ये जर मेट्रोच्या विकासाची गती वाढवली जाते तर मुंबईतल्या मेट्रो कारशेडचे काय?याबाबत काहीच बोलले जात नाही असंही म्हटलं आहे.
इंद्रायणी मेडिकल सीटी बनविण्याची घोषणा केली. 300 एकर जागेत उभी केली जाणार आहे. पुण्यामध्ये जागा बघून मेडिकल सीटी आणली जातेय की पुण्यासाठी मेडिकल सिटी आणली जातेय? याच्यावर सुद्धा मनात शंका निर्माण होते. या पद्धतीचे चित्र आहे. म्हणून एकंदरीतच बघितलं तर इतर मागासवर्गीय आयोगाला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केलंय. निधीची तरतूद दिसतच नाही. म्हणून हा अर्थसंकल्प स्वराज्यापेक्षा स्व हिताचा विचार करणारा आहे असं म्हणत शेलार यांनी निशाणा साधला आहे.
(2/2)@BJP4Maharashtra@AjitPawarSpeaks#BudgetSession2022#MaharashtraBudgetSession#MVApic.twitter.com/wF6UbemQpB
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 11, 2022