'भाजप २९ महानगरपालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष, विरोधकांचे नगरसेवकही आमच्या बाजूने; विजयानंतर रावसाहेब दानवेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:51 IST2026-01-16T17:46:01+5:302026-01-16T17:51:53+5:30
आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेने भाजपला २/३ बहुमत दिले आहे.

'भाजप २९ महानगरपालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष, विरोधकांचे नगरसेवकही आमच्या बाजूने; विजयानंतर रावसाहेब दानवेंची पहिली प्रतिक्रिया
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, या निकालात भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. मुंबईतही २५ वर्षांनंतर ठाकरेंची सत्ता गेली आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाने विजय मिळवला. दरम्यान, या निकालावर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २९ महानगरपालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असल्याचे त्यांनी सांगितले.
रावसाहेब दानवे म्हणाले की, जालना महापालिकेत भाजपने ६५ पैकी ४१ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे जालना महापालिकेचा पहिला महापौर भाजपचाच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे निवडून आलेले काही नगरसेवकही भाजपच्या बाजूने राहणार असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेने भाजपला २/३ बहुमत दिले आहे.
भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनीही निकालावर प्रतिक्रिया देताना, “हा माझा वैयक्तिक विजय नसून हा भाजपचा विजय आहे,” असे सांगत पक्षाच्या यशाचे श्रेय कार्यकर्ते आणि मतदारांना दिले.
महानगरपालिका निवडणुकांच्या या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.