मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
By नरेश रहिले | Updated: June 8, 2025 17:50 IST2025-06-08T17:49:20+5:302025-06-08T17:50:00+5:30
तिन्ही मृतक नागपूरच्या हिंगणा येथील: रावणवाडी पोलिसात मृत्यूची नोंद

मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
गोंदिया: लहान मुलाच्या पिंडदान करण्यासाठी गोंदिया तालुक्याच्या कोरणी घाटावर गेलेल्या आई व दोन मावस बहिणींचा कोरणी घाटातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ८ जून रोजी दुपारी १२:३० वाजता घडली. मिरा ईसुलाल तुरकर (५५), मिनाक्षी संतोष बघेले (३६) व स्मीता शत्रुघ्न टेंभरे (३९) तिन्ही रा. राजीवनगर वॉर्ड क्रमांक ४ हिंगना नागपूर अशी मृत महिलांची नावे आहेत.
मृतक मिरा ईसुलाल तुरकर यांच्या लहान मुलगा मुकेश तुरकर याचे निधन ३० मे २०२५ रोजी आजाराने झाल्याने त्याच्या पिंडदानासाठी गोंदिया तालुक्याच्या कोरणी घाटावर ८ जून रोजी दुपारी २ वाजता २० ते २५ लोक आले होते. दुपारी १२.३० वाजता पूजा करण्यापूर्वी आंघोळीसाठी महिला मंडळी घाटात उतरल्या. मुकेश तुरकरची वहीणी गायत्री राजेश तुरकर ह्या आंघोळ करीत असतांना त्यांचा पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी मिनाश्री संतोष बघेले (३६) हिने पाण्यात उडी घेतली. परंतु तिही बडून लागली. दोघ्याही बुडत असतांना पाहून स्मीता शत्रुघन टेंभरे (३०) हिने पाण्यात उडी घेत वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती देखील पाण्यात बुडाली. तिघ्या बुडत असल्याचे पाहून मिरा ईसुलाल तुरकर (५५) ह्या त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असतांना या प्रयत्नात त्या स्वत:चा जीव गमावून बसल्या. या घटनेची नोंद रावणवाडी पोलिसांनी घेतली आहे. तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
लहान मुलाच्या ओरडण्याने गायत्रीचा जीव वाचला
त्या चौघ्याही बुडत असल्याचे पाहून याच पिंडदानासाठी आलेल्यांपैकी एका मुलाने हा प्रकार पाहून आरडाओरड केली. त्यामुळे पिंडदानाची प्रक्रीयात असलेल्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यातील एकाने लगेच पाण्यात उडी घेऊन गायत्री राजेश तुरकर यांना वाचविले. परंतु मिनाश्री संतोष बघेले (३६), स्मीता शत्रुघन टेंभरे (३९) व मिरा ईसुलाल तुरकर (५५) यांना वाचविण्यात अपयश आले. त्या तिघींचा बुडून मृत्यू झाला.
ते मृतक मुळचे गोंदिया तालुक्यातील
या घटनेतील तिन्ही मृतक गोंदिया तालुक्याच्या गिरोला कन्हारटोला येथील मृळचे आहेत. रोजगाराच्या शोधात ते नागपूर हिंगनाोथे गेल्याने काही वर्षापासून ते त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. परंतु आपल्या पुर्वजांचे पिंडदान कोरणी घाटावरच होत असल्याने मुकेश तुरकर यांच्या पिंडदानाचाही कार्यक्रम कोरणी घाटावरच करून असा घरच्यांची धारणा बनली. त्यामुळे ते नागपूरवरून कोरणी घाटावर आले होते.