इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालकडे इतिहास रचण्याची संधी असेल.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करण्याचा विक्रम भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. या यादीत राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांचाही समावेश आहे. या दोघांचा विक्रम मोडण्याची जैस्वालकडे संधी आहे.
यशस्वी जयस्वालने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये २० सामन्यांमध्ये ५२.८६ च्या सरासरीने १९०३ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा गाठण्यापासून तो फक्त ९७ धावा दूर आहे.
एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जैस्वालने ९७ धावा केल्या तर तो सर्वात कमी सामन्यांमध्ये २००० कसोटी धावा करणारा भारतीय ठरेल. सध्या हा विक्रम लिटिल मास्टर सुनील गावस्करच्या नावावर आहे. गावस्करने २३ कसोटी सामन्यांमध्ये २००० धावांचा टप्पा ओलांडला. गावस्करचा हा विक्रम मोडण्यासाठी जयस्वालकडे दोन सामने असतील.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करणाऱ्या उर्वरित भारतीय फलंदाजांबद्दल बोललो तर, सुनील गावस्करनंतर राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याही नावाचा समावेश आहे. दोघांनीही ४०-४० डावांमध्ये हा विक्रम केला. तर गावस्करने ४४ डावांमध्ये २००० कसोटी धावा पूर्ण केल्या.
यशस्वी जयस्वालने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ३८ डाव खेळले आहेत. जैस्वालने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ९७ धावा केल्या तर तो सर्वात कमी डावांमध्ये २००० कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल.
लीड्स कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात यशस्व जयस्वालने शतक झळकावले होते, परंतु या सामन्यात त्याचे क्षेत्ररक्षण खूपच खराब होते. ज्यामुळे त्याला खूप ट्रोल करण्यात आले. त्याने दोन्ही डावांमध्ये किमान पाच झेल सोडले.