आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ

IPL Unwanted Record: आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येवर धावसंख्येवर ऑलआउट झालेल्या टॉप ५ संघाबद्दल जाणून घेऊयात.

आरसीबी: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा लाजिरवाणा विक्रम 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू'च्या नावावर आहे. २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आरसीबीचा संपूर्ण संघ अवघ्या ४९ धावांवर गारद झाला.

दिल्ली कॅपिटल्स: दिल्लीचा संघही या यादीत मागे नाही. २०१७ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध दिल्लीचा डाव केवळ ६७ धावांत आटोपला होता. याशिवाय, २०१९ आणि २०१७ मध्येही त्यांचा संघ कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला होता.

राजस्थान रॉयल्स: २००९ च्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ आरसीबी विरुद्ध फक्त ५८ धावांवर बाद झाला होता. हा या स्पर्धेच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात मोठा कोलमडलेला डाव मानला जातो.

मुंबई इंडियन्स: जरी मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघांपैकी एक असली, तरी २००८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध त्यांचा डाव फक्त ८७ धावांत संपला होता. तसेच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एका सामन्यात ते ८७ धावांवर बाद झाले होते.

कोलकाता नाईट रायडर्स: केकेआरचा संघ २००८ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध केवळ ६७ धावांवर बाद झाला होता. वानखेडे स्टेडियमवर मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले होते.