Join us

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:23 IST

Open in App
1 / 5

आशिया कपचा इतिहास पाहता, भारत आणि श्रीलंकेने आतापर्यंत प्रत्येकी ४५ सामने जिंकले आहेत. हे सामने एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही फॉरमॅटमधील आहेत. २०२५ च्या स्पर्धेत कोणता संघ आघाडीवर राहतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

2 / 5

भारत आणि श्रीलंकेच्या तुलनेत, पाकिस्तान संघ या यादीत खूप मागे आहे. १९८४ पासून आशिया कपमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानने आतापर्यंत ३४ सामने जिंकले आहेत आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

3 / 5

आशिया कपमध्ये सर्वात जास्त सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत १३ सामने जिंकले आहेत.

4 / 5

या यादीत अफगाणिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर आहे. अलीकडच्या काळात त्यांनी चांगली कामगिरी केली असून, आतापर्यंत त्यांनी ८ सामने जिंकले आहेत.

5 / 5

आशिया कपचा १७ वा हंगाम सध्या युएईमध्ये सुरू असून, या स्पर्धेत भारताने एक मोठा विक्रम केला आहे. स्पर्धेतील सहाव्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून भारताने आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमात भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत, तर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे.

टॅग्स :आशिया कप २०२५भारत