हे पाच खेळाडू भारताच्या विश्वचषकात संघात नसतील

श्रेयस अय्यर : मुंबईच्या श्रेयस अय्यरने 2017 साली भारताकडून पदार्पण केले होते. पण आगामी विश्वचषकात तो संघात नसेल, असे म्हटले जात आहे.

सिद्धार्थ कौल : वेगवान गोलंदाज कौलने आयपीएलमध्ये भेदक गोलंदाजी केली होती, पण भारतीय संघातील स्थान त्याला टिकवता आले नाही.

वॉशिंग्टन सुंदर : सुंदरने 2017 साली भारताकडून पदार्पण केले होते. पण सध्या तो भारताच्या संघात नाही.

मनीष पांडे : मनीष पांडेला भारतीय संघात स्थान मिळाले होते. पण त्याचे संघात कायम स्थान नाही.

कृणाल पंड्या : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात अष्टपैलू कृणालला संधी देण्यात आली होती. पण तो लंडनमधल्या विश्वचषकात खेळेल, अशी शक्यता फार कमी आहे.