Join us  

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela च नव्हे, तर भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' तरुणींमुळे लागले चार चाँद! Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 8:25 AM

Open in App
1 / 10

India vs Pakistan या सामन्याला बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) हिच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले, पण तिच्यासह काही ग्लॅमरस चेहऱ्यांना कॅमेरामनने अचूक टिपले...

2 / 10

बाबर आजम ( १०) अपयशी ठरल्यानंतर मोहम्मद रिझवान ( ४३) व इफ्तिखार अहमद ( २८) यांनी डाव सावरला. शाहनवाज दहानीने ६ चेंडूंत १६ धावा करून पाकिस्तानला १४७ धावांपर्यंत मजल मारून दिली. भुवनेश्वर कुरमाने २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

3 / 10

4 / 10

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ४ किंवा त्यापेक्षा विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत भुवनेश्वर कुमारने संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले. त्याने चारवेळा अशी कामगिरी करताना जोश हेझलवूड ( ऑस्ट्रेलिया) व मुस्ताफिजूर रहमान ( बांगलादेश) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पाकिस्तानच्या उम्रान गुलने ६ वेळा अशी कामगिरी केली आहे.

5 / 10

6 / 10

पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत भुवनेश्वर कुमारने ८ विकेट्ससह अव्वल स्थान पटकावले आहे. हार्दिक पांड्या ( ७), इऱफान पठाण ( ६), अशोक दिंडा ( ४) व रवींद्र जडेजा ( ४) हे त्याच्या मागोमाग आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या जलदगती गोलंदाजांनी प्रथमच सर्वच्या सर्व १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. भुवीने ४ ( २६ धावा ) , अर्षदीप सिंगने २ ( ३३ धावा), हार्दिक पांड्याने ३ ( २४ धावा) व आवेश खानने १ ( १९ धावा) विकेट घेतली.

7 / 10

हार्दिकने ३, अर्षदीप सिंगने २ व आवेश खानने १ विकेट घेतली. ट्वेंटी-२०त प्रथमच सर्वच्या सर्व १० विकेट्स भारतीय जलदगती गोलंदाजांनी घेण्याचा विक्रम केला. ३ विकेट्स अन् ३३ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) भारताच्या विजयाचा नायक ठरला.

8 / 10

प्रत्युत्तरात भारताला पहिल्या षटकात लोकेश राहुलच्या ( गोल्डन डक) रुपाने पहिला धक्का दिला. रोहित शर्मा ( १२) व विराट ( ३५) यांनी ४९ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ( १८) ३१ धावा जोडल्या. हार्दिक व जडेजाने २९ चेंडूंत ५२ धावा चोपून पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला.

9 / 10

10 / 10

अखेरच्या षटकात ७ धावा हव्या असताना जडेजाचा ( ३५ ) त्रिफळा उडवला. मॅच फिनिशर दिनेश कार्तिकने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत ६ धावा हव्या असताना हार्दिकने षटकार खेचून विजय पक्का केला. भारताने ५ विकेट्स राखून सामना जिंकला. हार्दिकने १७ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानउर्वशी रौतेलाऑफ द फिल्ड
Open in App