Join us

फक्त १२ धावा! त्यातही कोहलीनं साधला विक्रमी डाव; टी-२० त असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 01:34 IST

Open in App
1 / 10

आयपीएलच्या १८ व्या हंगामात किंग कोहलीच्या आरसीबीनं दिमाखदार विजय नोंदवत चौथ्यांदा फायनल गाठली आहे.

2 / 10

पंजाबच्या संघाने दिलेल्या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहली अवघ्या १२ धावांवर बाद झाला. पण या छोट्याखानी खेळीसह त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

3 / 10

टी-२० क्रिकेमध्ये त्याने १३५०० धावांचा पल्ला पार केला आहे. क्रिकेटच्या छोट्या प्रारुपात हा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरलाय. विराट कोहली हा टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या खात्यात आता आणखी एका खास विक्रमाची नोंद झालीये.

4 / 10

आयपीएलमध्ये विराट कोहलीची कामगिरी दमदार राहिली आहे. यंदाच्या हंगामात १४ सामन्यात त्याने ८ अर्धशकासह ६१४ धावा केल्या आहेत. RCB ला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी फायनलमध्येही त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.

5 / 10

विराट कोहलीने टी २० क्रिकेटमध्ये ४१३ सामन्यात एकूण १३५०० धावा करताना ९ शतकांसह १०५ अर्धशतके झळकावली आहेत.

6 / 10

7 / 10

ख्रिस गेलनं २००५ ते २०२२ या कालावधीत ४६३ सामन्यातील ४५५ डावात २२ शतके आणि ८८ अर्धशतकाच्या मदतीने १४५६२ धावा केल्या आहेत.

8 / 10

एलेक्स हेल्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. २००९ ते २०२५ पर्यंत ४९६ टी-२० सामन्यात त्याने ७ शतके आणि ८६ अर्धशतकासह १३६९८ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

9 / 10

पाकिस्तानचा शोएब मलिक याने २००५ ते २०२५ या कालावधीत ५५७ सामन्यात ८३ अर्धशतकाच्या मदतीने १३५७१ धावा केल्या आहेत.

10 / 10

केरॉन पोलार्डनं २००६ ते २०२५ या कालावधीत ६९५ सामन्यात १३५३७ धावा केल्या आहेत.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५विराट कोहलीइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट