मुंबई इंडियन्सच्या संघाने सुरुवातीच्या खराक कामगिरीनंतर दमदार फलंदाजी करत प्लेऑफ्सचे तिकीट मिळवले. मुंबईच्या यशात जसप्रीत बुमराहने महत्त्वाचे योगदान दिले.
जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाप्रमाणेच मुंबई इंडियन्सचाही हुकूमी एक्का आहे. मोक्याच्या वेळेला जसप्रीत बुमराहने मुंबईच्या संघाला विकेट्स मिळवून दिल्या आहेत.
२०१३ पासून जसप्रीत बुमराह मुंबईच्या संघाकडून खेळतोय. गेल्या १२ हंगामात त्याने अनेक विक्रम रचले. त्यातच एका सर्वात मोठ्या विक्रमाची भर पडली आहे.
जगातील कुठल्याही गोलंदाजाला जमलेला नाही असा एक मोठ्ठा विक्रम जसप्रीत बुमराहने केला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने ही किमया साधली आहे.
यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराहने ९ सामने खेळले असून १६ बळी घेतले आहेत. एका हंगामात १५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याचा त्याचा हा नववा हंगाम आहे.
IPLच्या इतिहासात कुठल्याही खेळाडूला ९ हंगामात १५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेता आलेले नाही. केवळ जसप्रीत बुमराहनेच ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
२०१३, २०१४ आणि २०१५ हे तीन हंगाम वगळता ज्या ज्या वेळी जसप्रीत बुमराह IPL खेळला, त्या प्रत्येक हंगामात त्याने १५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले आहे.
आतापर्यंतच्या सर्व हंगामात IPL 2020 हा जसप्रीत बुमराहचा सर्वोत्तम हंगाम ठरला आहे. त्या हंगामात बुमराहने १५ सामने खेळून तब्बल २७ बळी मिळवले होते.