'त्या' ६३ धावा महागड्या ठरल्या-
टीम इंडियाने आक्रमक खेळ केला. पण लॉर्ड्सवर अतिआक्रमकतेमुळे संघाला फटका बसला. राहुल, जाडेजा, नितीश रेड्डी, गिल, सिराज सर्वजण इंग्लिश खेळाडूंशी भांडले. त्यात भारतीय गोलंदाजांनी दोन डावांमध्ये एकूण ६३ अतिरिक्त धावा दिल्या, जे इंग्लंडच्या गोलंदाजांच्या दुप्पट आहे. त्याच धावा नंतर महागड्या ठरल्या.