Join us  

भारत वनडेत पुन्हा अव्वल;नागपुरात कांगारुंना चारली धूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 12:08 AM

Open in App
1 / 8

नागपूरमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला आणि पुन्हा वनडेत अव्वल स्थानावर कब्जा केला.

2 / 8

वनडे मालिकेतील ५ व्या आणि अंतिम वनडे सामन्यात रोहित शर्माच्या (१२५) धडाकेबाज शतकाच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला.

3 / 8

ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २४३ धावांचे आव्हान उभे केले होते. भारताने मात्र ४३ चेंडू शिल्लक ठेवत हे लक्ष्य पार केले.

4 / 8

या विजयाबरोबरच टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे.

5 / 8

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, निर्धारित ५० षटकांमध्ये ९ विकेट गमावत ऑस्ट्रेलियाला केवळ २४२ धावाच जमवता आल्या.

6 / 8

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर अक्षर पटेलने ३ गडी टिपले. मालिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

7 / 8

रोहित शर्माच्या दमदार खेळीमुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

8 / 8

तिसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वनडे रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर होती. परंतु बेंगळुरूतील चौथा वनडे गमावल्यानंतर भारतीय संघ एक पायरी खाली सरकला होता.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया