२०१६ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने टीने इंडियाला मोठा धक्का दिला होता. विराट कोहलीनं केलेल्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १९२ धावा केल्या होत्या. पण जॉन्सन चार्ल्स यांनी अर्धशतक झळकावले, लेंडल सिमन्स याने नाबाद ८२ धावांची शानदार खेळी केली, तर आंद्रे रसेल याने नाबाद ४३ धावा करत डावाला दमदार शेवट दिला.