पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानवर चहुबाजूंनी टीका होत आहे.
पाकिस्तानकडे आशिया चषकाचे यजमानपद असताना भारताचे सामने दुबईत खेळले गेले. तसेच, भारताकडे यजमानपद असल्याने पाकिस्तानचे टी२० वर्ल्डकपचे सामने श्रीलंकेत होणार आहेत.
बांगलादेशने आयसीसीला त्यांच्या संघाचे सामने भारतातून बाहेर हलवण्याची विनंती केली होती, परंतु आयसीसीने नकार दिला. या काळात बांगलादेशला फक्त पाकिस्ताननेच पाठिंबा दिला.
भारतात कुठलाही धोका नाही असा अहवाल दिल्यानंतरही बांगलादेशने ICC चे ऐकले नाही. त्यामुळे बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आणि त्याजागी स्कॉटलंडला संधी मिळाली.
बांगलादेशला स्पर्धेबाहेर केल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय घेतला. पाकिस्तानच्या निर्णयावर आयसीसीची तीव्र नाराजी आहे.
आयसीसीकडून पाकिस्तानला समज देण्यात आली आहे. पण तरीदेखील पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास पाकिस्तानची अवस्थाही बांगलादेशसारखी होऊ शकते.
जर आयसीसीने पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना स्पर्धेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला तर मात्र पाकिस्तानच्या जागी बदली संघ म्हणून युगांडा संघाला संधी मिळू शकते.
टी२० मध्ये सध्या समावेश नसलेल्या संघांच्या यादीत युगांडा हा रँकिंगमध्ये सर्वोच्च क्रमांक असलेला संघ आहे. स्कॉटलंडचीही निवड करतानाही याच प्रकारचे निकष लावण्यात आले होते.