के.एल. राहुलची भूमिका ठरणार निर्णायक
भारतीय संघाने १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एका बाजूने चार फलंदाज बाद झाले तरी सलामीवीर लोकेश राहुल एक बाजू लावून धरली आहे. लोकेश राहुल ३३ धावांवर नाबाद खेळत आहे. आता सामन्याच्या शेवटच्या दिवशी लोकेश राहुलने जबाबदारीने फलंदाजी करत एक बाजू लावून धरली तर भारतीय संघ विजयासमीप पोहोचू शकतो. तसेच रिषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी लोकेश राहुलला चांगली साथ दिल्यास भारताला विजयी लक्ष्य गाठणे सोपे जाईल.