Join us  

IND vs BAN, 3rd ODI : ८ सामन्यांत ५२४ धावा, तरीही टीम इंडियाला महाराष्ट्राचा फलंदाज नकोसा; चार देश फिरवून बाकावरच बसवले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 12:31 PM

Open in App
1 / 7

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: पहिल्या दोन सामन्यांत हार झाल्याने भारताने मालिका गमवाली आहे आणि आज अखेरच्या सामन्यात त्यांना उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. रोहित शर्मा, दीपक चहर व कुलदीप सेन यांनी दुखापतीमुळे दुसऱ्या वन डे नंतर मालिकेतूनच माघार घेतली आहे.

2 / 7

लिटन दासने सलग तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या संघात आज दोन बदल पाहायला मिळत आहेत. भारताच्या संघात रोहित शर्मा व दीपक चहर यांच्याजागी कुलदीप यादव व इशान किशन यांना संधी मिळाली आहे.

3 / 7

इशान किशनच्या एन्ट्रीने राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) ला चार देशांत केवळ प्रवास करूनच माघारी परतावे लागणार आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२२ मध्ये राहुलने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ८ सामन्यांत ८७.३३ च्या सरासरीने ५२४ धावा केल्या आहेत. त्यात ३ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे.

4 / 7

राहुल त्रिपाठी हा आयर्लंड ( २ ट्वेंटी-२० सामने), झिम्बाब्वे ( ३ वन डे सामने), दक्षिण आफ्रिका ( ३ वन डे सामने) आणि बांगलादेश ( ३ वन डे सामने) दौऱ्यातील संघाचा सदस्य होता, परंतु त्याला बाकावर बसवून ठेवण्यातच संघ व्यवस्थापनाने धन्यता मानली.

5 / 7

आयर्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर संधी न मिळालेल्या राहुलला बांगलादेशविरुद्ध खेळायला मिळेल अशी अपेक्षा होती. पम, रोहितच्या दुखापतीनंतरही त्याला बाकावरच बसवून ठेवले गेले. आयपीएलच्या प्रत्येक पर्वात राहुलने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे शिवाय स्थानिक स्पर्धाही तो गाजवतोय.

6 / 7

राहुलने प्रथम क्षेणी क्रिकेटमध्ये ४९ सामन्यांत २६५६ धावा, लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५३ सामन्यांत १७८२ धावा आणि १२५ ट्वेंटी-२० सामन्यांत २८०१ धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर २९ विकेट्सही आहेत.

7 / 7

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशमहाराष्ट्रविजय हजारे करंडक
Open in App