Join us  

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न: IPL 2020बाबतच्या 'त्या' निर्णयावरून फ्रँचायझींमध्ये मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 4:29 PM

Open in App
1 / 8

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमासाठी कंबर कसली आहे.

2 / 8

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) बैठकीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कपबाबत ठोस निर्णय अजूनही झालेला नाही. तरीही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं आयसीसीच्या बैठकीनंतर लगेच राज्य संघटनांना पत्र पाठवून आयपीएलसाठी सज्ज राहण्यास सांगितले.

3 / 8

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता प्रेक्षकांविना आयपीएल खेळवण्याची तयारी बीसीसीआयनं दर्शवली आहे. पण, बीसीसीआयच्या या निर्णयामुळे फ्रँचायझींमध्ये मतभेद सुरू झाल्याचे वृत्त आहे.

4 / 8

कोरोना व्हायरसमुळे प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवण्याचा नवा पायंडा पडला आहे. त्यामुळे बीसीसीआयनंही रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. पण, आयपीएलच्या काही संघमालकांना बीसीसीआयची ही कल्पना आवडलेली नाही.

5 / 8

कोलकाता नाइट रायडर्सचे सीईओ आणि एमडी वेंकी मैसोर यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले,''खेळाडू, प्रेक्षक, स्टाफ आणि प्रत्येकाच्या आरोग्याचा व सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवं. त्यासाठी नियम बनले आहेत. त्यामुळे जर आयपीएल 20202 झाल्यास ती प्रेक्षकांशिवाय होईल, हे गृहित धरायला हवं. त्यासाठी सर्वांनी तयार रहायला हवं.''

6 / 8

पण, मैसोर यांनी आयपीएल झाल्यास त्याच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदल खपवून घेतला जाणार नाही, हे स्पष्ट केले.

7 / 8

दिल्ली कॅपिटल्सचे सीईओ धीरज मल्होत्रा यांनी सांगितले की,''सध्या हाच एक पर्याय समोर आहे. एकूण महसूलातील 15-20% रक्कम मी स्टेडियममधील प्रेक्षकांमुळे मिळत होती. प्रेक्षकांविना आयपीएलचा थरार वेगळा असेल, परंतु प्रत्येकानं ते मान्य करायला हवं.''

8 / 8

चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांना प्रेक्षकांविना खेळवण्याच्या मुद्द्यावरून बीसीसीआयकडून आणखी स्पष्टता हवी आहे. हा अखेरचा पर्याय असायला हवा, असेही त्यांचे मत आहे.

टॅग्स :आयपीएल 2020बीसीसीआयसौरभ गांगुलीकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्सकिंग्ज इलेव्हन पंजाब