Join us

'सेनापती' गिलसह या ५ खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने जिंकली बर्मिंगहॅमची 'लढाई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 23:58 IST

Open in App
1 / 9

2 / 9

इंग्लंडच्या या मैदानात विजय मिळवणारा भारत हा आशियातील पहिला संघ अन् शुबमन गिल पहिला कॅप्टन ठरला आहे.

3 / 9

इथं एक नजर टाकुयात भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पाच खेळाडूंच्या खास कामगिरीवर...

4 / 9

इंग्लंडच्या बाल्लेकिल्ल्यातील लढाई जिंकून देण्यात सेनापती अर्थात टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल सर्वात आघाडीवर होता. गिलनं पहिल्या डावातील द्विशतकासह दुसऱ्या डावात शतकी कामगिरी करताना ४३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

5 / 9

रिषभ पंत यानेही दोन्ही डावात मिळून ९० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या डावात त्याने केलेली फटकेबाजी इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडणारी होती.

6 / 9

अष्टपैलू रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात गोलंदाजीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याआधी दोन्ही डावात अर्धशतकी खेळीसह इंग्लंडच्या संघासमोर धावांचा डोंगर उभारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली

7 / 9

गोलंदाजीमध्ये आकाश दीपनं पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत एकूण १० विकेट्स घेत बुमराहची कमी भरून काढली.

8 / 9

मोहम्मद सिराजनेही पहिल्या डावातील ६ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या डावात सलामीची जोडी फोडत या सामन्यात त्याने ७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

9 / 9

प्रमुख गोलंदाज १७ विकेट्स मिळवून देत असतील, तर कॅप्टनच काम आणखी सोपे होते, अशा शब्दांत मॅचनंतर शुबमन गिलनं सिराज आणि आकाश दीपच्या गोलंदाजीच कौतुक केल्याचेही पाहायला मिळाले.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलआकाश दीपमोहम्मद सिराजरवींद्र जडेजारिषभ पंत