भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पूर्णवेळ बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविणारा गांगुली हा दुसरा कर्णधार ठरणार आहे.
65 वर्षांपूर्वी हा मान भारतीय संघाच्या कर्णधाराला मिळाला होता.
गांगुलीनं भारताचे माजी कर्णधार महाराजकुमार ऑफ विजयानगरम यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.
महाराजकुमार यांनी 1936साली तीन कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्यानंतर 1954 ते 1956 या कालावधीत त्यांनी बीसीसीआयचे पूर्णवेळ अध्यक्षपद भूषविले होते.
2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत गांगुलीनं कर्णधार विराट कोहलीबद्दल मोठं विधान केले आहे.