भारताचा माजी अष्टपैलू फलंदाज युवराज सिंगनं मंगळवारी इंस्टाग्राम लाईव्हवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यानं टीम इंडियाच्या फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवाय त्यानं अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
युवीनं गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवीनं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींची फिरकी घेतली. ''सध्याचे खेळाडू जास्त बोलत नाही आणि सल्लाही घेत नाहीत. रवी शास्त्री खेळाडूंना मार्गदर्शन करतात की नाही, हे मला माहित नाही, परंतु त्यांच्याकडे अन्य जबाबदारी असेल. मैदानावर जा आणि तुझा खेळ कर, असं तुम्ही प्रत्येकाला सांगू शकत नाही. असा दृष्टीकोन सेहवागसारख्या खेळाडूसाठी योग्य आहे, परंतु पुजाराच्या तो कामी येणार नाही. प्रशिक्षकांच्या स्टाफनं याचा विचार करायला हवा.''
'आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल
... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला