World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात निराशाजन राहिली. पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही अर्धा तास उशीरानं सुरू झाला आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनं दिवसाच्या चौथ्याच षटकात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला माघारी पाठवले. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये RCBकडून खेळणाऱ्या कायले जेमिन्सननं टीम इंडियाला हा धक्का दिला. त्यानं विराटला 44 धावांवर पायचीत केलं अन् टीम इंडियाला कालच्या धावसंख्येत 3 धावांचीच भर घालता आली आहे. विराटनं DRS घेतला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
दरम्यान, रोहित शर्मा व शुबमन गिल यांची टीम इंडियाला साजेशी सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. रोहित ( 34) व शुबमन ( 28) यांची 62 धावांची भागीदारी कायले जेमिन्सननं संपुष्टात आणली. विराट व पुजारा यांनी संयमी खेळ करताना टीम इंडियाचा डाव सावरला होता. पूजारानं 54 चेंडूंत दोन चौकारांसह 8 धावा केल्या. पुजारा व विराट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 95 चेंडूंत 25 धावांची भागीदारी केली. विराट व अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना दुसऱ्या दिवशी भारताची धावसंख्या 3 बाद 146 धावांपर्यंत नेली.
विराट कोहली 44, तर अजिंक्य रहाणे 29 धावांवर खेळत आहेत. भारतीय फलंदाजांनी 64.4 षटकांत 2.25च्या सरासरीनं धावा केल्या.