Join us

... तर आम्हाला प्लेइंग इलेव्हनमधून ४ खेळाडूंना वगळावे लागेल; असं का म्हणाला आर अश्विन?

कसोटी क्रिकेटमध्ये 'Bazball' नवीन संकप्लना जगभरातील चाहत्यांच्या पसंतीत पडत आहे आणि भारतानेही ही शैली वापरावी असा जोर धरला जातोय.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 19:38 IST

Open in App

ब्रेंडन मॅक्युलमने जून २०२२ मध्ये जेव्हा इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतली तेव्हापासून इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये 'Bazball' स्टाइल आली. इंग्लंडने आक्रमक खेळ करताना दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यावर विजय मिळवले. नुकत्याच पार पडलेल्या अॅशेस मालिकेतही ०-२ अशा पिछाडीवरून २-२ अशी बरोबरी मिळवली. कसोटी क्रिकेटमध्ये ही नवीन संकप्लना जगभरातील चाहत्यांच्या पसंतीत पडत आहे आणि भारतानेही ही शैली वापरावी असा जोर धरला जातोय.  

पण, भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याच्यामते ही शैली भारतात चालणार नाही आणि त्यामागचं कारणंही त्याने सांगितलं. तो म्हणाला, आम्ही कसोटी क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय, परंतु आम्ही लवकरच एका संक्रमणातून जाणार आहोत आणि त्या टप्प्यात गोष्टी सोप्या होणार नाहीत. येथे आणि तेथे काही समस्या असतील. ” 

अश्विनने असेही निदर्शनास आणून दिले की भारतीय चाहते आणि व्यवस्थापनाकडे समान संयम नाही, ज्यामुळे बेन स्टोक्स आणि मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला त्यांच्या नवीन दृष्टिकोनातून अडचणी सोडवता आल्या. “आपण असे गृहीत धरू या की भारत या संक्रमणाच्या काळात बॅझबॉलचा अवलंब करत आहे. एक खेळाडू हॅरी ब्रूक सारखी फटकेबाजी करतो आणि आम्ही दोन कसोटी सामने गमावतो, असे समजूया. मग आम्ही काय करणार? आम्ही बॅझबॉल आणि खेळाडूंना पाठीशी घालू का? आम्ही आमच्या प्लेइंग इलेव्हनमधून किमान चार खेळाडूंना वगळू.” 

इंग्लंडने पत्करलेल्या धोक्याचं फळ त्यांना मिळतंय आणि त्यांनी कसोटी क्रिकेट अधिक मनोरंजक केली आहे. दरम्यान, भारताचाही कसोटी क्रिकेटमधील अप्रोच यशस्वी ठरला आहे. रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी तसा खेळ करून दाखवला आहे. त्यामुळे फक्त एकाच शैलीसोबत खेळण्याची आम्हाला गरज वाटत नाही. परिस्थितीनुसार आमचे खेळाडू तसा खेळ करू शकतात, असेही अश्विन म्हणाला.  

"आपली संस्कृती नेहमीच अशीच आहे. म्हणून, आम्ही इतरांच्या शैलीची कॉपी करू शकत नाही. कारण ती त्यांच्यासाठी उपयोगी ठरते. हे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे कारण त्यांचे व्यवस्थापन या खेळाच्या शैलीशी पूर्णपणे सहमत आहेत. त्यांचे निवडकर्ते खेळाडूंना अशा प्रकारे खेळण्यासाठी पाठीशी घालतात. किंबहुना, कसोटी सामना पाहणारे लोकही या प्रक्रियेत संघाला पाठिंबा देत आहेत. पण आम्ही हे करू शकत नाही, ” असे अश्विनने स्पष्ट केले.   

टॅग्स :आर अश्विनभारतीय क्रिकेट संघ
Open in App