Join us
Daily Top 2Weekly Top 5

U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार

पाकिस्तानने ५० षटकांत ८ बाद ३४७ धावांचा डोंगर उभारला. भारताचा डाव २६.२ षटकांत १५६ धावांवर गारद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 06:08 IST

Open in App

दुबई : संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिल्यानंतर दडपणाखालीकेलेल्या चुकांमुळे भारतीय युवा संघाला १९ वर्षांखालील आशिया चषकस्पर्धेच्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध तब्बल १९१ धावांनी पराभव पत्करावा लागला. यासह पाकिस्तानने दुसऱ्यांदा युवा आशिया चषक पटकावला, तर भारताला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. 

पाकिस्तानने ५० षटकांत ८ बाद ३४७ धावांचा डोंगर उभारला. भारताचा डाव २६.२ षटकांत १५६ धावांवर गारद झाला. वैभव सूर्यवंशीने (२६) आक्रमक सुरुवात केली. परंतु, त्यानंतर भारतीय फलंदाजीला गळती लागली. त्याआधी, समीर मिन्हासने (१७२) पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारून दिली.

मैदानावरील चुरस क्रिकेटपुरती मर्यादित राहिली नाही. अंडर-१९ आशिया चषक २०२४ च्या अंतिम सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पराकोटीला पोहोचला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

मैदानावर नेमकं काय घडलं?

अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. सामन्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू असताना नाट्यमय घडामोडी घडल्या. मोहसीन नक्वी हे बक्षीस देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, भारतीय संघातील खेळाडू आणि व्यवस्थापनाने नक्वी यांच्या हस्ते पदक किंवा ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. बराच वेळ मैदानावर हा 'हाय व्होल्टेज ड्रामा' सुरू होता.

नकारामागचे कारण काय?

बीसीसीआय (BCCI) आणि पीसीबी यांच्यातील संबंध मागील काही काळापासून कमालीचे ताणलेले आहेत. विशेषतः चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये वाद सुरू आहे. याच राजकीय आणि प्रशासकीय वादाचे पडसाद आता मैदानावरही पाहायला मिळाले. भारतीय खेळाडूंच्या या भूमिकेमुळे आशियाई क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अधिकारीही चक्रावून गेले होते.

संक्षिप्त धावफलक पाकिस्तान : ५० षटकांत ८ बाद ३४७ धावा (समीर मिन्हास १७२, अहमद हुसैन ५६, उस्मान खान ३५; दीपेश देवंद्रन ३/८३, खिलन पटेल २/४४, हेनिल पटेल २/६२.) वि. वि. भारत : २६.२ षटकांत सर्वबाद १५६ धावा (दीपेश देवंद्रन ३६, वैभव सूर्यवंशी २६, खिलन पटेल १९; अली रझा ४/४२, आहसन २/१२, अब्दुल सुभन २/२९, मोहम्मद सय्यम २/३८.)

English
हिंदी सारांश
Web Title : U19 Asia Cup: India loses to Pakistan; refuses medal from PCB chief.

Web Summary : India U19 lost the Asia Cup final to Pakistan by 191 runs after batting collapse. Indian team refused to accept medals from PCB chief due to strained relations.
टॅग्स :आशिया कप २०२५पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ