England vs India 1st Test Day 2: लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा पहिला डाव ४७१ धावांत आटोपला आहे. शुबमन गिल आणि रिषभ पंत या जोडीनं ३ बाद ३५९ धावांवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. रिषभ पंतच्या रुपात या कसोटी सामन्यात टीम इंडियाला तिसरा शतकवीर मिळाला. पण ढग दाटून आले अन् टीम इंडियानं सेट केलेले वातावरणच बदलले. कर्णधार शुबमन गिलनं विकेट गमावल्यावर ठराविक अंतराने भारतीय संघाने अल्प धावसंख्येत सर्वच्या सर्व विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले.'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
इंग्लंडच्या संघाचे दमदार कमबॅक, कर्णधार बेन स्टोक्सनं घेतल्या चार विकेट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:59 IST